(ह्याच विषयावर मी आधी ही येथे लिहिले होते. पण तो बसमध्ये/इतर गाड्यांमध्ये बसून घेतलेला अनुभव होता. आजचे लेखन आहे स्वत: गाडी चालवताना घेतलेल्या अनुभवांवरून)
शुक्रवारी रात्री माझ्या दुचाकीवरून कार्यालयातून घरी येत होतो. तीच नेहमीची गर्दी. मुलुंड चेकनाका पार करून ठाण्यात शिरलो. जकातीसाठी ट्रक हळू हळू पुढे जात होते. मी ते रांगेत होते म्हणत नाही आहे. त्यांतून मार्ग काढत कार आणि दुचाकी जात होत्या. जकात नाका पार करून पुढे आलो. दोन रुग्णवाहिका पुढे जाण्याच्या प्रयत्नात होत्या. पण ट्रक आणि कार मधून पुढे जाणे कठीण पडत होते. त्याने शेवटी सायरन वाजवला. एक दोन गाड्यांमधुन जागा मिळाल्यावर पुढे गेले. मी ही आपला मागून जागा शोधत/काढत त्यातून पुढे आलो. पुढे तीन हात नाक्याच्या उड्डाणपुलावर पुन्हा ट्रकची गर्दी. तिकडून पूल उतरल्यावर पाहिले दोन्ही रुग्णवाहिका अजून तिकडे रस्ता मिळण्याची वाट पाहत ट्रकच्या मागे जात होत्या. नीट पाहिले तेव्हा कळले की तो ट्रक डावीकडच्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात उजवीकडून पुढे जात होता. पण त्यामुळे पूर्ण रस्ता बंद झाल्याचे त्याला जाणवले नाही. रुग्णवाहिकेचे चालक अधूनमधून सायरन वाजवत होते. मी मग कसातरी मार्ग काढत त्या दोन रुग्णवाहिकांच्या पुढे गेलो. त्या ट्रकचालकाच्या सहकार्याला म्हटले,"मागून रुग्णवाहिका येत आहे त्याला तरी जागा द्या रे. नेहमी ओव्हरटेक काय करायचे असते तुम्हाला" त्याने मागे पाहिले आणि ट्रक डावीकडे घ्यायला सांगितला. पण तोपर्यंत आम्ही पुढील उड्डाणपूलापर्यंत पोहोचलो होतो. मी पूलावर न जाता डावीकडे गेलो आणि त्या रुग्णवाहिका जागा मिळाल्याने ट्रकच्या पुढे जात आहेत असे दिसले. पुढे त्यांना किती मोकळा रस्ता मिळाला त्याचा अंदाज नाही.
हे नेहमीचेच झाले आहे. आधी कंपनीच्या बसने यायचो तेव्हा काय त्यांच्या वेळेवर निघणे. बाकी त्या चालकाचे काम आम्हाला आमच्या ठिकाणी नेणे. पण भरपुर वेळा काम असल्याने उशीरा निघायला लागायचे तर बस चुकायची म्हणून दुचाकीने जायला सुरूवात केली. सुरूवातीला वेगळे वाटले पण नंतर कार्यालयातून घरी निघताना विचार सुरू असतो केव्हा बाहेर पडायचे? कारण गेटबाहेर निघाल्यावरच वाहतुकीचा खोळंबा सुरू झालेला असतो. लगेच समोर मोकळा रस्ता असला तरी पुढच्या सिग्नलला गर्दी असणारच. उदा. अंधेरीकडून पवईमार्गे पूर्व दृतगती मार्गावर जाताना गेल्या वर्षी पवई तलावापासून आय आय टी मुख्य द्वारापर्यंत रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीचा खोळंबा असायचा. तो रस्ता ठीक झाल्यावर वाटले की चला मार्ग मोकळा झाला. तसे नाही. आता कांजुरमार्ग/गांधीनगर जोडणीला मस्त गर्दी असायची. तशीच ह्या बाजूला एल अँड टी चा पूल सुरू व्हायच्या आधी. आता पहावे तर कांजूरमार्ग ते पूर्व दृतगती मार्गावरचा जो पूल आहे तिथे थांबून रहावे लागते. थोडक्यात उर्जेच्या नियमाचा थोडासा प्रकार म्हटला तर ह्या सिग्नलवरून त्या सिग्नलवर स्थलांतरीत होत असतो.
ह्यातही लोक सरळ गाडी चालवतील तर एकवेळ समजू शकतो. पण आधीच गर्दी असेल तिथे वाकडी तिकडी गाडी चालवून गोंधळ वाढवत असतात. एका गाडीच्या मागे जायचे सोडून दोन गाड्यांच्या मधून गाडी चालवणार म्हणजे त्या दोघांमध्ये जागा मिळाली की लगेच त्यात गाडी घुसवता येईल ह्या विचाराने. त्यामुळे होते काय की एक गाडी पुढे त्याच्या मागे उजव्या बाजूला, गाडीचा डावा भाग थोडासा रांगेतून आत ठेवत काहीसे असे
--_ --
-- --
--
म्हणजे होते काय की मध्ये भरपूर रिकामी जागा असते पण फक्त स्वतःला पुढे जायला कधी मिळेल ह्या चढाओढीत रस्ता अडवून ठेवला आहे हे बहुतेक वेळा पाहिलेच जात नाही. (लोकलमध्ये कसे असते पहा दरवाज्यावर सर्व लोक लटकून असतात आणि सांगतात आत जागा नाही. प्रत्यक्षात आता भरपूर जागा असते) आणि हे फक्त कारचालक करतात असे नाही तर दुचाकी, रिक्षा, बस, ट्र्क सर्व चालक. मग आता जी वर मोकळी जागा आहे त्यातून मी दुचाकीवरून आरामात पुढे निघून जातो. पण त्या तिथे पोहोचण्याकरीता चक्रव्यूह पार करावे लागते. बरं त्यात पोहोचलो तरी आराम नाहीच. पुन्हा इकडून तिकडून कोण मध्ये यायचा प्रयत्न करेल सांगता येत नाही. अजून एक. साधारणपणे दुचाकीस्वार डाव्या बाजून पुढे जायच्या प्रयत्नात असतात. मग तिथे त्यांच्यात चढाओढ असते. मग मध्येच गाडी डावीकडे टाक, लगेच उजवीकडे असेही काही. आणि आता हद्द म्हणजे ह्यांनी रस्त्याच्या बाजूचे चालण्याकरीता बनविलेले पदपथ (फूटपाथ हो) सोडले नाही. बहुतेक दुचाकीस्वार त्या पदपथावरून पुढे जात असतात. मी आपला शिस्तीत रस्त्यावरुन जात असतो. लागले १० मिनिटे जास्त लागू दे.
तरी आधी रात्री थोडे उशिरा निघून कमी गर्दीत घरी जाता येईल असे वाटत असे. आता तर तिथेही अडचण. ९च्या नंतर निघालो तर ट्रकलाही परवानगी दिलेली असते. मग तेही लोक जमेल तशी गाडी हाकत असतात. आणि तुम्ही हळू जात असाल तर डाव्या बाजून जावे असे नाही, भले मी हळू जात असेन, समोरच्या ट्रकपेक्षा किंचित जास्त वेग घेऊन मला त्याच्या पुढे जायचे आहे. पण ह्या त्यांच्या प्रयत्नात मागे किती गाड्या अडकून पडल्या आहेत ते पाहत नाही. २ महिन्यांपूर्वी असेच गुजरातमध्ये जायचे होते म्हणून सकाळी ५:३० ला निघालो. पण त्या महामार्गावर एवढे ट्रक असे रस्ता अडवून जात होते की सकाळी लवकर निघून लवकर पोहोचण्याचा विचार विरुन गेला.
हं तर सुरूवात केली होती रुग्णवाहिकेवरून. रुग्णवाहिका जात असेल तर साधारणपणे आपण त्या गाडीला रस्ता द्यायचा असतो हे बहुधा कोणी लक्षात घेतच नाही. अमेरिकेत एक अनुभव आला (कोण रे ते म्हणाले, अमेरिकेत काय आता कोणीही जायला लागलेत :P ) सिग्नलवर पांढरा बारीक दिवा लावला असतो. तो तार्यांप्रमाणे लुकलुक करत असतो. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची गाडी, किंवा पोलिसांची गाडी जाणार असेल तर तो दिवा सुरू करतात. तेव्हा, किंवा मध्येच सायरन ऐकू येईल तेव्हा सर्व बाजूंची वाहतूक पूर्णपणे थांबते. लोक आपली गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला थांबवून ठेवतात. म्हणजे डावीकडून त्या गाड्यांना मार्ग मिळेल. तिकडे आणि इथे नेमकी तुलना करणे नाही. तसे काही करायचेही बहुधा इथे आता नेमके शक्य नाही. पण निदान त्या अत्यावश्यक सेवेच्या गाड्यांना थोडी तरी जागा मिळावी ही अपेक्षा. काही लोक तर रूग्णवाहिकेला मार्ग मिळाला तर त्यामागे रिकामी जागा असते म्हणून त्या गाडीच्या मागे आपली गाडी नेत असतात. हा प्रकार काही कळला नाही.
सध्या तरी एवढेच. काही वेळा वाटते आधी इथे वाहन चालवायची थोडी शिस्त होती. ती बिघडत चालली आहे. तसेच मी ही नीट चालवतो असे मला वाटते. पण 'जावे त्याच्या देशा' किंवा 'When in Rome... 'ह्या प्रमाणे किंवा गर्दीश सिनेमातील मुकेश ऋषी च्या "तुम्हे जिंदा रहना है, तो मुझे मारना पडेगा" वाक्याप्रमाणे हा प्रकार असाच वाढत जाणार असेच वाटते.
(अजून एक बाब आहे, सर्वांच्याच परिचयाची. पण ती पुढील वेळी)
शुक्रवारी रात्री माझ्या दुचाकीवरून कार्यालयातून घरी येत होतो. तीच नेहमीची गर्दी. मुलुंड चेकनाका पार करून ठाण्यात शिरलो. जकातीसाठी ट्रक हळू हळू पुढे जात होते. मी ते रांगेत होते म्हणत नाही आहे. त्यांतून मार्ग काढत कार आणि दुचाकी जात होत्या. जकात नाका पार करून पुढे आलो. दोन रुग्णवाहिका पुढे जाण्याच्या प्रयत्नात होत्या. पण ट्रक आणि कार मधून पुढे जाणे कठीण पडत होते. त्याने शेवटी सायरन वाजवला. एक दोन गाड्यांमधुन जागा मिळाल्यावर पुढे गेले. मी ही आपला मागून जागा शोधत/काढत त्यातून पुढे आलो. पुढे तीन हात नाक्याच्या उड्डाणपुलावर पुन्हा ट्रकची गर्दी. तिकडून पूल उतरल्यावर पाहिले दोन्ही रुग्णवाहिका अजून तिकडे रस्ता मिळण्याची वाट पाहत ट्रकच्या मागे जात होत्या. नीट पाहिले तेव्हा कळले की तो ट्रक डावीकडच्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात उजवीकडून पुढे जात होता. पण त्यामुळे पूर्ण रस्ता बंद झाल्याचे त्याला जाणवले नाही. रुग्णवाहिकेचे चालक अधूनमधून सायरन वाजवत होते. मी मग कसातरी मार्ग काढत त्या दोन रुग्णवाहिकांच्या पुढे गेलो. त्या ट्रकचालकाच्या सहकार्याला म्हटले,"मागून रुग्णवाहिका येत आहे त्याला तरी जागा द्या रे. नेहमी ओव्हरटेक काय करायचे असते तुम्हाला" त्याने मागे पाहिले आणि ट्रक डावीकडे घ्यायला सांगितला. पण तोपर्यंत आम्ही पुढील उड्डाणपूलापर्यंत पोहोचलो होतो. मी पूलावर न जाता डावीकडे गेलो आणि त्या रुग्णवाहिका जागा मिळाल्याने ट्रकच्या पुढे जात आहेत असे दिसले. पुढे त्यांना किती मोकळा रस्ता मिळाला त्याचा अंदाज नाही.
हे नेहमीचेच झाले आहे. आधी कंपनीच्या बसने यायचो तेव्हा काय त्यांच्या वेळेवर निघणे. बाकी त्या चालकाचे काम आम्हाला आमच्या ठिकाणी नेणे. पण भरपुर वेळा काम असल्याने उशीरा निघायला लागायचे तर बस चुकायची म्हणून दुचाकीने जायला सुरूवात केली. सुरूवातीला वेगळे वाटले पण नंतर कार्यालयातून घरी निघताना विचार सुरू असतो केव्हा बाहेर पडायचे? कारण गेटबाहेर निघाल्यावरच वाहतुकीचा खोळंबा सुरू झालेला असतो. लगेच समोर मोकळा रस्ता असला तरी पुढच्या सिग्नलला गर्दी असणारच. उदा. अंधेरीकडून पवईमार्गे पूर्व दृतगती मार्गावर जाताना गेल्या वर्षी पवई तलावापासून आय आय टी मुख्य द्वारापर्यंत रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीचा खोळंबा असायचा. तो रस्ता ठीक झाल्यावर वाटले की चला मार्ग मोकळा झाला. तसे नाही. आता कांजुरमार्ग/गांधीनगर जोडणीला मस्त गर्दी असायची. तशीच ह्या बाजूला एल अँड टी चा पूल सुरू व्हायच्या आधी. आता पहावे तर कांजूरमार्ग ते पूर्व दृतगती मार्गावरचा जो पूल आहे तिथे थांबून रहावे लागते. थोडक्यात उर्जेच्या नियमाचा थोडासा प्रकार म्हटला तर ह्या सिग्नलवरून त्या सिग्नलवर स्थलांतरीत होत असतो.
ह्यातही लोक सरळ गाडी चालवतील तर एकवेळ समजू शकतो. पण आधीच गर्दी असेल तिथे वाकडी तिकडी गाडी चालवून गोंधळ वाढवत असतात. एका गाडीच्या मागे जायचे सोडून दोन गाड्यांच्या मधून गाडी चालवणार म्हणजे त्या दोघांमध्ये जागा मिळाली की लगेच त्यात गाडी घुसवता येईल ह्या विचाराने. त्यामुळे होते काय की एक गाडी पुढे त्याच्या मागे उजव्या बाजूला, गाडीचा डावा भाग थोडासा रांगेतून आत ठेवत काहीसे असे
--_ --
-- --
--
म्हणजे होते काय की मध्ये भरपूर रिकामी जागा असते पण फक्त स्वतःला पुढे जायला कधी मिळेल ह्या चढाओढीत रस्ता अडवून ठेवला आहे हे बहुतेक वेळा पाहिलेच जात नाही. (लोकलमध्ये कसे असते पहा दरवाज्यावर सर्व लोक लटकून असतात आणि सांगतात आत जागा नाही. प्रत्यक्षात आता भरपूर जागा असते) आणि हे फक्त कारचालक करतात असे नाही तर दुचाकी, रिक्षा, बस, ट्र्क सर्व चालक. मग आता जी वर मोकळी जागा आहे त्यातून मी दुचाकीवरून आरामात पुढे निघून जातो. पण त्या तिथे पोहोचण्याकरीता चक्रव्यूह पार करावे लागते. बरं त्यात पोहोचलो तरी आराम नाहीच. पुन्हा इकडून तिकडून कोण मध्ये यायचा प्रयत्न करेल सांगता येत नाही. अजून एक. साधारणपणे दुचाकीस्वार डाव्या बाजून पुढे जायच्या प्रयत्नात असतात. मग तिथे त्यांच्यात चढाओढ असते. मग मध्येच गाडी डावीकडे टाक, लगेच उजवीकडे असेही काही. आणि आता हद्द म्हणजे ह्यांनी रस्त्याच्या बाजूचे चालण्याकरीता बनविलेले पदपथ (फूटपाथ हो) सोडले नाही. बहुतेक दुचाकीस्वार त्या पदपथावरून पुढे जात असतात. मी आपला शिस्तीत रस्त्यावरुन जात असतो. लागले १० मिनिटे जास्त लागू दे.
तरी आधी रात्री थोडे उशिरा निघून कमी गर्दीत घरी जाता येईल असे वाटत असे. आता तर तिथेही अडचण. ९च्या नंतर निघालो तर ट्रकलाही परवानगी दिलेली असते. मग तेही लोक जमेल तशी गाडी हाकत असतात. आणि तुम्ही हळू जात असाल तर डाव्या बाजून जावे असे नाही, भले मी हळू जात असेन, समोरच्या ट्रकपेक्षा किंचित जास्त वेग घेऊन मला त्याच्या पुढे जायचे आहे. पण ह्या त्यांच्या प्रयत्नात मागे किती गाड्या अडकून पडल्या आहेत ते पाहत नाही. २ महिन्यांपूर्वी असेच गुजरातमध्ये जायचे होते म्हणून सकाळी ५:३० ला निघालो. पण त्या महामार्गावर एवढे ट्रक असे रस्ता अडवून जात होते की सकाळी लवकर निघून लवकर पोहोचण्याचा विचार विरुन गेला.
हं तर सुरूवात केली होती रुग्णवाहिकेवरून. रुग्णवाहिका जात असेल तर साधारणपणे आपण त्या गाडीला रस्ता द्यायचा असतो हे बहुधा कोणी लक्षात घेतच नाही. अमेरिकेत एक अनुभव आला (कोण रे ते म्हणाले, अमेरिकेत काय आता कोणीही जायला लागलेत :P ) सिग्नलवर पांढरा बारीक दिवा लावला असतो. तो तार्यांप्रमाणे लुकलुक करत असतो. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची गाडी, किंवा पोलिसांची गाडी जाणार असेल तर तो दिवा सुरू करतात. तेव्हा, किंवा मध्येच सायरन ऐकू येईल तेव्हा सर्व बाजूंची वाहतूक पूर्णपणे थांबते. लोक आपली गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला थांबवून ठेवतात. म्हणजे डावीकडून त्या गाड्यांना मार्ग मिळेल. तिकडे आणि इथे नेमकी तुलना करणे नाही. तसे काही करायचेही बहुधा इथे आता नेमके शक्य नाही. पण निदान त्या अत्यावश्यक सेवेच्या गाड्यांना थोडी तरी जागा मिळावी ही अपेक्षा. काही लोक तर रूग्णवाहिकेला मार्ग मिळाला तर त्यामागे रिकामी जागा असते म्हणून त्या गाडीच्या मागे आपली गाडी नेत असतात. हा प्रकार काही कळला नाही.
सध्या तरी एवढेच. काही वेळा वाटते आधी इथे वाहन चालवायची थोडी शिस्त होती. ती बिघडत चालली आहे. तसेच मी ही नीट चालवतो असे मला वाटते. पण 'जावे त्याच्या देशा' किंवा 'When in Rome... 'ह्या प्रमाणे किंवा गर्दीश सिनेमातील मुकेश ऋषी च्या "तुम्हे जिंदा रहना है, तो मुझे मारना पडेगा" वाक्याप्रमाणे हा प्रकार असाच वाढत जाणार असेच वाटते.
(अजून एक बाब आहे, सर्वांच्याच परिचयाची. पण ती पुढील वेळी)
2 प्रतिक्रिया:
chaan ....
http://harshadsamant.wordpress.com
धन्यवाद हर्षद :)
टिप्पणी पोस्ट करा