डिसेंबर ३०, २०१०

गेल्या आठवड्यात नागपूरला जाण्याचा योग आला. साधारण ६ १/२ वर्षांनंतर फेरी होत होती, मे २००४ नंतर. स्वत:च्या कामाकरीता मामेभावासोबत त्याच्या दुचाकीवरच तिकडे भटकंती(ढोबळ मानाने) करता आली.  त्याबद्दल थोडेसे.

मी तिकडे पोहोचलो बुधवारी रात्री. ठाणे- मुंबईत तापमान २० च्या खाली जाऊन थंडी वाढली तेव्हा तिकडचे तापमान १० च्या खाली आहे असे बातम्यांमध्ये ऐकत होतो. त्यामुळे त्या तयारीनेच गेलो होतो. पण विमानातून उतरतानाच त्यांनी घोषणा केली बाहेरचे तापमान २१.५ आहे. बाहेर भाऊ भेटला, तो म्हणाला आज थंडी नेहमीपेक्षा खूप कमी आहे. माझ्या पूर्ण सहलीत तापमान वाढलेलेचे होते. आता थंडी कमी म्हणून आनंद मानावा की नागपूरची थंडी अनुभवता येणार नाही ह्याची खंत? ;)

२००१/२ मध्येच पाहिल्याप्रमाणे, ठाणे शहरानंतर तिकडे गेलेल्या टी. चंद्रशेखर ह्यांनी नागपूर शहराचा कायापालट केला होता. रस्ता रुंदीकरण ही त्यातली मोठी गोष्ट. सगळीकडे फिरताना मोठे मोठे रस्ते दिसत होते. त्यामानाने तर ह्यावेळी भरपूर बदल दिसला होता. रस्ते तर काय शहराचाच विस्तार दिसत होता.

ह्याच विस्ताराकरीता कारणीभूत असणारे एक आहे नागपूर सुधार प्रन्यास किंवा Nagpur Improvement Trust (NIT).


 पण सुधारणांच्या प्रशंसेसोबतच त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागते. कारण नागपूर महानगर पालिकेसोबतच लोकांना मालमत्तेच्या कामाकरीता ह्यांचे वेगळे नियम ही पाळावे लागतात आणि त्यांना वेगळे कर वगैरे देणेही.


तसेच पाहिलेले (NITचेच) Krazy Castle Aqua Park. पाण्यातील खेळांचे उद्यान. आतून तर नाही पाहिले, पण त्याच्यासमोरून फिरताना जमेल तसे चित्र घेण्याचा प्रयत्न केला.


ही आहे रिझर्व बँकेची इमारत.



नागपूर शहर भारताच्या केंद्रस्थानी आहे हे माहित होते. पण त्याचे एक शून्य मैलाचे स्थान आहे व तिकडे काही वास्तूही उभारली आहे हे माहित नव्हते. ह्या भटकंतीत हे ही पाहून घेतले.


ह्या शून्य मैलाच्या दगडाशेजारी आधी एक पेट्रोलपंप होते, जे ह्या चित्रात स्तंभाच्या मागे आहे. (ह्या चित्राचे स्त्रोतः विकिपिडिया)


पण ह्या जागेचे वेगळे महत्व असल्याने त्यांना ती जागा रिकामी करायला सांगून दुसर्‍या एका मोक्याच्या ठिकाणी त्या पेट्रोलपंपाला जागा देण्यात आली. आता ती मोकळी जागा अशी आहे.
 

ह्या भटकंतीत एवढेच.

अरे हो राहिलेच.
हा पहा नागपूरचा सांताक्लॉज. अजुन एक पाहिला होता, लाल ऐवजी पूर्ण राखाडी/चंदेरी रंगाचे कपडे घालून. पण त्याचे छायाचित्र नाही घेता आले.



येताना नागपूरची प्रसिद्ध हल्दीरामची संत्र्याची बर्फी आणली आहे.
 


रविवारपर्यंत संपर्क केल्यास (आणि उरली असल्यास) मिळण्याची शक्यता सांगू शकतो ;) 

डिसेंबर २९, २०१०

"लता मंगेशकर ए आर रहमान करीता पहिल्यांदा गाणार." 
’दिल से’ चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधी त्या लोकांनी जाहिरात केली होती. मी आणि माझ्या मित्राची चर्चा चालू होती की लता मंगेशकर ने गाणे गायला सुरूवात केल्याच्या कितीतरी वर्षांनंतर हा संगीतकार आला. त्यात मग लता मंगेशकर ने त्याच्याकरीता गाणे गायले ह्यात एवढे काही खास नाही. (लता मंगेशकर ओ. पी. नय्यर कडे गायली नाही ही गोष्ट सोडा. ती गोष्ट घडली असती तरी बातमी झाली असती का माहित नाही.) पण चित्रपटसृष्टीत (आणि इतरत्र ही) असे पहिल्यांदा होणारी, खूप वर्षांनी होणारी गोष्ट प्रकाशझोतात आणली जाते. काही वेळा त्यात किती तथ्य असेल ते ही न पाहता. अनुराधा पौडवाल ने १९९८/९९ मध्ये कोणत्या तरी सिनेमात गाणे गायले होते तेव्हाही असेच काहीतरी म्हणत होते की अनुराधा पौडवाल १० वर्षांनी पुन्हा चित्रपटात गाणे गात आहे. पण त्या आधीच १९९७ मध्ये ’और प्यार हो गया’ चित्रपटात तिचे गाणे ऐकले होते. आता शोधले तर १९७६ ते २००८ मध्ये प्रत्येक वर्षी तिने गाणे गायलेले दिसते. त्यांना बहुधा ’टी सीरीज’च्या बाहेर १० वर्षांनंतर म्हणायचे असेल. आमिर खान आणि काजोलचा ’फना’ सिनेमा आला तेव्हा दोघे पहिल्यांदा एका चित्रपटात, एका फ्रेम मध्ये असे काही तरी चालले होते. पण त्या आधी दोघे ’इश्क’ चित्रपटात येऊन गेले होते हे ते लोक विसरले होते किंवा मग त्यांना हे दोघे नायक-नायिका जोडीत पहिल्यांदा आलेत असे म्हणायचे असेल.


असो. हे जुने झाले. आता नवीन ताजी बातमी आहे. मराठीतील दोन दिग्गज कलाकार/दिग्दर्शक पहिल्यांदा एकत्र येत आहेत, ’आयडियाची कल्पना’ ह्या नवीन चित्रपटात. ते दोघे आहेत महेश कोठारे आणि सचिन (पिळगांवकर). ही गोष्ट खरोखरच बातमीसारखी आहे असे मला तरी वाटते. गेले कित्येक वर्षे मी मराठी चित्रपटांबद्दल बोलतो तेव्हा ह्या दोघांचे नाव अर्थातच पुढे असते. त्यातच माझ्या निरीक्षणातील गोष्ट होती की महेश कोठारेच्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे नेहमी असायचा आणि सचिनच्या चित्रपटात अशोक सराफ. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हे अनुक्रमे सचिन आणि महेश कोठारेंच्या चित्रपटात अधून मधून असत. पण सचिन आणि महेश कोठारे हे एकमेकांच्या चित्रपटात नव्हते. आता कित्येक वर्षांनंतर महेश कोठारे सचिनच्या दिग्दर्शनाखाली त्याच्या चित्रपटात काम करणार आहे. ही माझ्याकरीता बातमीच आहे. 

तसेच ह्या चित्रपटाद्वारे आणखी एक गोष्ट पहिल्यांदा होत आहेत. ते म्हणजे गायनानंतर आता सचिनचे संगीतकार म्हणून नवीन क्षेत्रात पदार्पण.

सचिन आणि महेश कोठारेचा विषय निघालाच आहे तर आणखी एक जाणवलेली गोष्ट. सचिनच्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेचे (आणि इतर सर्वजणांचेही) काम संतुलित वाटायचे. पण महेश कोठारेच्या चित्रपटात तो मोकाट सुटलेला दिसायचा. आणि बहुधा इतरही लोक. 

आता ह्या नवीन चित्रपटात पाहू कोणाचे काम कसे आहे ते आणि एकंदरीत पूर्ण चित्रपट कसा आहे ते.

(जाता जाता: आमिर खानचा पहिला चित्रपट ’कयामत से कयामत’ किंवा खरे तर ’यादों की बारात’ हा आहे. त्याच्या भावाचा, फैजल खानचा, पहिला चित्रपट कोणता? )

डिसेंबर २७, २०१०

’तीस मार ख़ान’ ह्या अक्षय कुमार अभिनित चित्रपटाबद्दल गेले काही दिवस ऐकत होतो, पाहत होतो. अक्षय कुमारचे ह्या आधीचे विनोदी चित्रपट आवडले होते ('दिवाने हुए पागल' सारखे अपवाद सोडून) त्याचे अशा चित्रपटांतील कामही आवडत होते. तसेच फराह खान चे ही ह्या आधीचे दोन चित्रपट (’मैं हू ना’ आणि ’ओम शांती ओम’) चांगले वाटले होते. म्हणून हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता होतीच. त्यात मग शनिवार २५ डिसें ला हा चित्रपट पहायची संधी मिळाली.





पण चित्रपटाच्या सुरूवातीलाच काही अंशी अपेक्षाभंगाला सुरूवात झाली. पहिल्या प्रसंगापासूनच सर्व लोकांचा म्हणजे सचिन खेडेकर, विजय पाटकर, अक्षय कुमार, अली असगर, कतरीना कैफ, अक्षय खन्ना ह्यांचा अभिनय हा नाटकीच वाटत गेला. आता नाटकी म्हणजे नाटकात पहायला मिळतो तसा नाही. तिथेही सुंदर अभिनय पहायला मिळतो. पण इथे तसला प्रकार नाही. गाणी बरी आहेत. ’शीला की जवानी’ हे बहुचर्चित गाणे मी तरी पहिल्यांदाच पाहिले. ऐकायलाच बरे वाटते. चित्रपटाची कथा तेवढी चांगली वाटली आणि पुर्वार्धापेक्षा उतरार्ध त्यामानाने चांगला आहे, थोडा वेगवान. त्यामुळे मग चित्रपट एकदम आवडला तर नाही पण कंटाळवाणा नाही वाटला. अरे हो, चित्रपटाच्या सुरूवातीचे आणि शेवटचे नामप्रदर्शन चांगले आहे.


फराह खानचा ’ओम शांती ओम’ आला तेव्हा ऐकले होते की ज्यांना ’मै हूं ना’ आवडला नसेल त्यांना ’ओम शांती ओम’ आवडेल. माझ्याकरीता तरी ’मैं हूं ना’ एकदम चांगला चित्रपट होता. ’ओम शांती ओम’ त्यापेक्षा कमी. पण ’तीस मार खान’ एकदमच कमी. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावर एका तासात मी हा चित्रपट पाहिल्याचेही विसरून गेलो होतो.


माझ्याकडून तरी चित्रपटाला ५ पैकी २ ते २.५ तारे मिळतील ;)
(चित्रपटाचे चित्र indiafm.com वरून)

डिसेंबर २१, २०१०

जालरंग प्रकाशनाच्या शब्दगाऽऽरवा, हास्यगाऽऽरवा,ऋतू हिरवा, जालवाणी, दीपज्योती ह्या अंकांनंतर ’शब्दगाऽऽरवा २०१०’ ह्या हिवाळी अंकाचे प्रकाशन २० डिसें २०१० ला झाले.

ह्याचा दुवा http://hivaliank2010.blogspot.com

डिसेंबर १३, २०१०

आज संध्याकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर पाहिले की अमेरिकेत सलग ८६ तास दूरदर्शन पाहणार्‍या तिघा जणांची गिनिज विश्वविक्रमात नोंद करण्यात आली आहे. तसेच त्यांना १०००० डॉलर्सचे बक्षीसही देण्यात आले आहे. पण ८६ तास त्यांनी काय पाहिले त्याची बातमी मिळाली नाही.

आंतरजालावर बातम्या शोधणे आजकाल कठीण काम नाही. मी ती बातमी शोधायचा प्रयत्न केला. लगेच मिळाली ह्या दुव्यावर. एक '२४' नावाची मालिका पाहत होते ते लोक. तिच्या जाहिरातीकरीता त्या निर्मात्यांनी ही एक स्पर्धा ठेवली होती.

मनात विचार आला, मी ही एवढा वेळ दूरदर्शन पाहत असतो. आपल्या इथेही अशी स्पर्धा ठेवा की, नक्कीच जिंकेन. कारण जिथे सास बहू च्या मालिका, टुकार चित्रपट पचवायची सवय पडली आहे. (गेले काही वर्षे आमच्या घरात तरी त्या मालिका लागत नाहीत. पण चित्रपट तर आपली संस्कृती आहे, आणि चांगल्यातल्या चांगला ते वाईटातला वाईट चित्रपट पाहण्यासाठी विश्वविक्रम नक्की करू शकतो ;)) तिथे स्पर्धेकरीता असे कार्यक्रम पुन्हा पाहून घेऊ.

मग वाटले, कोणता कार्यक्रम ते जरा विचार करावा लागेल. कारण इमोशनल अत्याचार, बिग स्विच, बिग बॊस, राखी का इन्साफ वगैरे (हे मला माहित असलेले आणि डोक्यात जाणारे कार्यक्रम) असेल तर स्पर्धा जरी जिंकलो तरी त्याचा आनंद भोगता येणार नाही. कारण तिकडून थेट वेड्यांच्या इस्पितळात भरती व्हावे लागेल.

पण तेव्हाचे तेव्हा पाहू. आता तरी सलग किती तास दूरदर्शन पाहू शकतो ते मोजायला सुरूवात करू का? स्पर्धेचा बिगुल वाजला की लगोलग कार्यालयातही आठवड्याभराची सुट्टी टाकता येईल. ;)

डिसेंबर ०९, २०१०

साधारण २००६ पासून ऐकण्यात असलेली ’मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी’ सुविधा अखेर २५ नोव्हें २०१० पासून हरियाणामध्ये सुरू झाली. इतर भागांत ती २० जाने २०११ पासून सुरू होईल अशा बातम्या आहेत.

मी ह्या ४ वर्षांत ३ क्रमांक बदलले. पण ह्या सुविधेचा मला फायदा झाला नसता, कारण माझे शहर आणि मोबाईलचे क्षेत्र ह्यांतच बदल होत गेला. आणि सध्यातरी ह्या सेवादात्याकडून एकदम बदलूनच टाकावे अशी काही वाईट सेवा नाही. तरीही ही सुविधा नेमकी कशाप्रकारे वापरता येईल हे पहायचा प्रयत्न केला. त्यात मिळालेली चांगली माहिती तुम्हालाही सांगावी असे वाटले.


मराठीमध्ये तरी ह्याबाबतची माहिती मला मटाच्या संकेतस्थळावरच मिळाली. त्यासोबतच इतरत्र आणखी माहिती शोधायचा प्रयत्न केला.


दूरसंचार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर अर्थातच सर्व सूचना/माहिती आहेच. पण बहुतेक वेळा ती आपल्यासारख्या सर्वांना समजण्यासारख्या सोप्या भाषेत नसते. पण तिकडे पाहिल्यावर भरपूर कळण्यासारखे वाटले ;).


त्या सर्व माहिती/नियम पुस्तिकांचे दुवे.

    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/87/Backgroundnote.pdf
    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/87/draftregulation30june09.pdf
    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/89/Regulation23sep09.pdf
    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/90/Regulation20nov09.pdf
    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/91/MNPRegulation_amendment28jan10.pdf
    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/97/MNP_Regulation24nov10.pdf


"मलेशियामध्ये सध्या ही सेवा सुरू असून तेथे अॅक्टीव्हेशन आणि डीअॅक्टिव्हेशनमध्येच अडथळे येत आहेत. त्यामुळेच तेथे ही सेवा यशस्वी झालेली नसल्याचे टेलिकॉम क्षेत्रात ऑडिट आणि सल्लागाराची जबाबदारी पेलत असलेले केपीएमजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर रोमाल शेट्टी सांगतात."
मटावरील ह्या वाक्यामुळे असे वाटले की फक्त मलेशियातच ही सुविधा सुरू आहे. पण अमेरिका आणि इंग्लंड, ऑस्ट्रेलिया वगैरे देशांमध्येही सुविधा आहे असे ऐकून होते. त्यामुळे संभ्रम झाला. पण मग विकिपिडियावर त्याबाबत दिलेल्या माहितीप्रमाणे ५० पेक्षा अधिक देशांनी आधीच ही सुविधा सुरू केली आहे. विकिपिडियावर अर्थातच नेहमीप्रमाणे सुरेख माहिती दिली आहे.

त्यातूनच मग मला दुसर्‍या संकेतस्थळाचा दुवा मिळाला, जिथे भारतातील मोबाईल नंबर पोर्टेबिलीटीबाबत माहिती आणि सर्वसाधारण किंवा नेहमी पडणार्‍या प्रश्नांची  उत्तरे दिली आहेत.


मटावर तर मुद्देसूद माहिती दिलेलीच आहे. तरीही ज्या काही गोष्टी लिहिल्या नाहीत त्या म्हणजे.

    * सुविधा घेण्याकरीता PORT < NUMBER > असा एसएमएस १९०० ह्या क्रमांकावर पाठवायचा आहे. उदा. PORT 9812345678
    * जुन्या प्रिपेड कार्डची उरलेली रक्कम नवीन कार्डवर नेता येणार नाही.
    * जुन्या कंपनीचे सिम कार्ड नवीन कंपनीच्या क्रमांकावर वापरता येणार नाही. नवीन कंपनीचे सिम कार्डच वापरावे लागेल.

सुरूवातीला असे वाटत होते की पोर्टेबिलीटीचा दर एवढा नको आणि प्रक्रिया अशी किचकट नको की त्यापेक्षा ती सुविधा न घेणेच बरे. पण प्रक्रिया ही सोपी आहे आणि दूरसंचार मंत्रालयाच्या पुस्तिकेत दिल्याप्रमाणे १९ रू हा दर खालील प्रमाणे ठरविण्यात आला आहे.

तपशील
एकक
रक्कम
एकूण खर्च
दशलक्ष रू
२३२०.४७
सरासरी सेवादाता बदल (पोर्टींग)
दशलक्ष  
१२३.२६
प्रत्येक बदलाचा खर्च  
रू.
१८.८३
लायसन्स फी @१%
रू.
०.१९
प्रत्येक बदलास एकूण खर्च
रू.
१९.०२
जवळील ठोकळ संख्येत खर्च
रू.
१९.००


म्हणजे १२३ दशलक्ष क्रमांकांचे लोक स्वत:च्या सेवादात्यावर खुष नाहीत/नसतील. तरीही सेवादाता आपली सुविधा सुधारण्यास तयार नव्हते?

सध्यातरी एवढी माहिती पुरे. आपल्या भागात ही सुविधा सुरू करेपर्यंत ह्या प्रक्रियेत बदल न करोत अशी आशा. :)


डिसेंबर ०४, २०१०

संध्याकाळी 'मैने प्यार किया' चित्रपटातील अंताक्षरी पाहता पाहता ’रूक जा ओ जानेवाली’ गाण्याबद्दल एक आठवले.
हे गाणे राज कपूर दारूच्या बाटलीकरीता गातो की नूतनकरीता? ते पाहण्याकरता युट्युब वर गाणे शोधले आणि लावले. दिसले ते तर दारूची बाटली घेऊनच, नूतन इतरत्र फिरत होती :).
कोणाला ह्याबद्दल माहित आहे का?

हे गाणे संपल्यावर बाजूला इतर गाण्यांचे दुवे दिसले.

मुकेशचे ’ये मेरा दिवानापन है’ 
मग ’चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये
मग त्यातच आठवले ’तेरी जुल्फोंसे जुदाई तो नहीं मांगी थी
त्यानंतर ’तेरे घर के सामने इक घर बनाऊंगा
मग ’मेरे मेहबूब तुझे मेरी मोहब्बत की कसम
त्यावरून ’मेरे मेहबूब कयामत होगी’ ...

एक एक मस्त गाणी...सर्वच आवडती. एकामागोमाग एक ऐकता येतील पण आंतरजालावरील अमर्याद संग्रहात गेलो तर त्याच नादात अख्खी रात्र जाईल.
त्यापेक्षा रेडिओ लावावा किंवा घरातील जुन्या गाण्यांच्या कॅसेट काढून लावाव्यात असा विचार आला. (जुना हा शब्द सापेक्ष आहे)


तर ऐकतो माझा संग्रह उघडून.

नोव्हेंबर २४, २०१०

काल दुपारी भ्रमणध्वनी वाजला. पलिकडून आवाज आला, " सर, मैं xxxx बात कर रहा हूं आयडियासे. एक स्कीम के बारे में बताना है." मला तेव्हा काही बोलायची इच्छा नव्हती म्हणून "कोणतीही स्कीम नाही पाहिजे" असे म्हणालो. तो म्हणाला, "सर, स्कीम क्या हैं सुन तो लिजिये". दोन तीन दिवसांपूर्वीच जाहिरातीत पाहिल्याप्रमाणे नंबर पोर्टेबिलिटीची नवीन सुविधा देण्याबाबत असेल असे वाटले. इच्छा नव्हती, तरीही मग म्हणालो,"ठीक आहे. मराठीत सांगत असशील तर ऐकतो." त्याने अं अं केले आणि काही न बोलता फोन बंद केला.

पुन्हा मनात विचार आले, ह्या आयडिया वाल्यांचीच जाहिरात आहे "बोलने के लिये भाषा की जरूरत नहीं पडती", मग आता वापरायची होती की ती युक्ती. :)

ती जाहिरात काहीही असो, आणि कोणीतरी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रात सर्व भाषा दिल्यात असेही असेल. पण मला ती जाहिरात राज ठाकरेंना टोमणा म्हणून वापरली आहे असेच वाटत आलेय. आधीही त्यांनी अशीच जाहिरात बनविली होती. राज ठाकरेनी अमिताभ बच्चनना हिंदी मराठी भाषेवरून काही म्हटले. अभिषेक बच्चन ने आयडियाच्या जाहिरातीतून त्याला उत्तर दिले. हे म्हणजे पेप्सी, कोका कोला आणि थम्सअप सोबत स्प्राईट च्या जाहिरातबाजीप्रमाणे वाटले. पेप्सीने थप्सअपच्या जाहिरातीचे विडंबन करीत नवीन जाहिरात बनविली. मग कोकाकोलाने पेप्सीच्या जाहिरातीचे विडंबन केले. आणि मग स्प्राईटने त्या सर्वांवर वरचढ बनायचा प्रयत्न केला.

पुन्हा भाषेच्या मुद्यावर येऊ. त्यांची जाहिरात खरोखर विचार करण्यासारखी वाटते. पण मग असेही वाटते की त्यांच्या ''बोलने के लिये भाषा की जरूरत नही पडती" असे म्हणण्याचा खरंच फरक पडतो का? शेवटी भाषेने फरक पडेलच. मी इथे सध्या तरी जमेल तिथे मराठी भाषा वापरायचा प्रयत्न करत असतो. एटीएम, दुकान, फोन वगैरे वगैरे. पण इतके वर्षांपासून कोणाशी ज्या भाषेत बोलत आलोय सवयीने त्याच भाषेत बोलणे होते. आणि ती भाषा मराठी नसल्यास हिंदीच असते :)

असो,

आता शुक्रवारीच माझ्या मोबाईल वर एक कॉल आला माझ्या सेवादात्याकडून. मुंबईत नोंदणी असलेल्या क्रमांकावर मुंबईतील क्रमांक एकचा सेवा दाता बनविल्याबद्दल हे लोक गुजराती मध्ये बोलून आभार प्रदर्शित करीत होते. आता ह्यांना काय म्हणावे? पुन्हा ते ही म्हणायचे, "भाषा काय घेऊन बसलात. भावना महत्त्वाच्या." :)

नोव्हेंबर २२, २०१०

CBFC कडून दिलेल्या जाणार्‍या चित्रपटाच्या प्रमाणपत्राची वैधता १० वर्षे असे माहित होते. आणि कुठे तरी ऐकल्याप्रमाणे त्या १० वर्षांत त्याच नावाचा दुसरा चित्रपट बनू शकत नाही. पण गेल्या १०-१५ वर्षांत मग तशीच नावे वापरून पुढे काहीतरी ओळ जोडण्याची प्रथा चालू झाली.

असो. तो माझा आजचा विषय नाही. माझा विषय आहेत एकाच कलाकाराने काम केलेले एकाच नावाचे दोन चित्रपट. मग त्यात दहा वर्षेही गेली असतील किंवा जास्त ही.

त्यातील काही नावे म्हणजे:


'संतान' -
कलाकार जितेंद्र. जुना चित्रपट आला होता १९७६ मध्ये. आणि त्यानंतर १९९३ मध्ये. पहिल्या चित्रपटात जितेंद्रनेच संतान साकार केला होता. दुसर्‍या चित्रपटात दिपक तिजोरीने आणि जितेंद्र ने त्याच्या वडिलांची भुमिका केली होती.

'दिवार'
-  कलाकार अमिताभ बच्चन. पहिला आला होता १९७५ मध्ये. सह कलाकार शशी कपूर (भाऊ). दुसरा २००४ मध्ये. सह कलाकार अक्षय खन्ना (मुलगा).

'बरसात'
- कलाकार बॉबी देओल. पहिला चित्रपट आला होता १९९५ मध्ये. ग्रीक देवतेच्या पुतळ्याप्रमाणे दिसणारा बॉबी देओल (असे मी ’गुप्त’ चित्रपटाच्या परीक्षाणात वाचले होते :) ) नंतर फार चमकला नाही, पण त्याचे चित्रपट मधे मधे येत राहिले. २००५ मध्ये  त्याच्या पुन्हा 'बरसात' नावाच्या चित्रपटाचे नाव पाहिले तेव्हा वाटले होते, की ह्याचा पहिला आणि शेवटचा दोन्ही चित्रपट एकाच नावाचे असतील की काय? ;) पण तसे झाले नाही.


मला सध्या तरी आठवत असलेल्या तीन चित्रपटांची ही नावे. तुम्हाला आणखी माहीत असल्यास जरूर सांगा. तेवढीच आपल्या गंमतीशीर ज्ञानात थोडी भर :)


जाता जाता- १९९९ मध्ये आलेल्या 'संघर्ष' ह्या सिनेमात अमन वर्मा ह्या कलाकाराने काम केले होते. त्याचे नाव चित्रपटात दुसरेच होते. पण अक्षय कुमारचे नाव त्या चित्रपटात अमन वर्माच होते. हा योगायोग होता का?

नोव्हेंबर २१, २०१०

'स्टार माझा'च्या 'ब्लॉग माझा ३' स्पर्धेचा निकाल काल जाहीर करण्यात आला. ह्यावेळी  परीक्षक लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी), विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक, सा. ‘साधना’) आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) यांनी निवडले यांनी सहा विजेते आणि तीस उत्तेजनार्थ ब्लॉगर्स निवडले आहेत.

संबंधित निकाल 'स्टार माझा'च्या संकेतस्थळावर येथे पाहता येईल.

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन :)

मी सर्व ब्लॉग पाहिले नाही आहेत. ह्यातील काही जणांशी आंतरजालावर आधीपासून ओळख झाली आहेच. त्यांचे ब्लॉग पाहिले होते. आता इतरजणांचेही उत्तम ब्लॉग कळले. ते ही पाहीन :)

नोव्हेंबर १७, २०१०

'बिग बॉस ४' आणि 'राखी का इंसाफ' ह्या कार्यक्रमांवर अखेर निर्बंध घालण्यात आलेत. ते कार्यक्रम रात्री ११ ते ५ ह्या वेळेत दाखविणे तसेच वृत्तवाहिन्यांना ह्या कार्यक्रमांची दृष्ये न दाखवण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत.

उशीरा केलेली पण चांगली गोष्ट. मी दोन्ही कार्यक्रम पूर्ण पाहिले नाहीत. 'राखी का इंसाफ' तर पहायला सुरूवात केल्यानंतर १५ मिनिटांत बंद केले होते. लोकांवर एवढी वाईट परिस्थिती आली आहे का? मान्य आहे की एखादा वाद मिटविण्याकरीता आपण कोणीतरी तटस्थ माणूस शोधतो. त्याकरीता मग एखादा अनोळखी माणूसही निवडू शकतो. किरण बेदी ठीक आहेत हो, त्या पोलीस अधिकारी होत्या. एखादा न्यायाधिश नाही तरी त्यांचे म्हणणे ऐकू शकतो. पण न्याय देण्याकरीता राखी सावंत? आणि राखीचे बोलणे पाहून तर ती वाद मिटविण्यापेक्षा आगीत तेल ओतत आहे असेच वाटते.

तसेच 'बिग बॉस'. हा कार्यक्रम ही सूरूवातीपासून वाद निर्माण करूनच मग चित्रीकरण केले जाते असे वाटते. गेल्या मोसमातील आणि ह्या मोसमातील त्या कार्यक्रमाचे काही भाग पाहून, पाश्चिमात्य देशांचे कार्यक्रम आणले म्हणजे ते त्या प्रकारेच दाखविले जावेत म्हणून मुद्दाम त्यात ह्या गोष्टी टाकल्या जातात असे वाटते.

आज 'स्टार माझा'वर ह्याबद्दल चर्चा चालू होती. कांचन अधिकारी ह्या निर्बंधाच्या पक्षात आहेत असे दिसले. त्यांनी दिलेले मुद्दे पटतात की आपण एका ठिकाणी संस्कृती वगैरे सांगत असतो मग असे प्रकार का? कार्यक्रम असा असावा की सर्वजण पाहू शकतील वगैरे वगैरे. दुसरा एक पाहुणा, कोणीतरी शाह म्हणून होता. नक्की शब्द आठवत नाही पण त्याचे म्हणणे असे की "संस्कृती वगैरे ठीक आहे. पण आजच्या पिढीतील लोकांना जसे पाहिजे तसे आम्ही दाखवतो. आमच्यावर निर्बंध कशाला?" काहीतरी यूट्युब चे ही उदाहरण दिले की तिथे आज सर्व शिव्या असलेले व्हिडीयो ही उपलब्ध आहेत, तिथे सर्व उघडपणे असते, काही निर्बंध नाही. मला त्याला सांगावेसे वाटेल की "तुम्हाला जर वाटते की आजच्या पिढीतील लोकांना हे पटते म्हणून तुम्ही दाखवता हे एकवेळ मान्य केले तरी सर्व लोक तसे मानत नाहीत. अजूनही त्याला वेळ आहे. तुम्हाला ते कार्यक्रम तसे दाखवायचे असतील तर दाखवा, पण त्यालाही कुठे दाखवतो त्या क्षेत्राप्रमाणे मर्यादा असतील. आणि मग त्याची जशी वेळ ठरविली गेली असेल तसे दाखवा. तसेच युट्युबवरही मर्यादा आहेत. तिथेही तक्रार केली की तसे व्हिडियो काढले जातात."

ह्या दोन कार्यक्रमांसोबतच आणखी एक कार्यक्रम आहे. बिन्दास वाहिनीवरील "ईमोशनल अत्याचार". ह्या कार्यक्रमावरही अशाच प्रकारचे निर्बंध घातले जावेत, म्हणजे रात्री ११ ते ५ ही वेळ ठेवणे आणि वृत्तवाहिन्यांना ह्यांची दृश्ये दाखविणे ह्यावर बंदी आणणे, असे वाटते.


जर पाश्चिमात्य देशांत असे उघडपणे दाखवले जाते असे कोणी म्हणत असेल तर त्यांना सांगावेसे वाटेल की तिकडची गोष्ट इथे आणायची असेल तर पूर्ण प्रकारात आणा. कार्टून पासून मालिकांपासून चित्रपटांपर्यंत जे काही दूरदर्शन वाहिन्यांवर दाखवले जाते, तो कार्यक्रम कोणत्या प्रकारचा आहे, तसेच कोणत्या वयोगटाच्या प्रेक्षकांकरीता आहे हे त्या कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच वरच्या कोपर्‍यात दाखविले जाते. मग पुढे तो कार्यक्रम पाहणार्‍याची इच्छा.


आपल्या इथेही तसेच काहीतरी करूया. मग म्हणू की आता प्रेक्षकाला निर्णय घेऊ दे. काय? बरोबर?

नोव्हेंबर १४, २०१०

'गोलमाल', 'चष्मेबद्दूर', 'चुपके चुपके': मजेदार, विनोदी चित्रपट. भरपूर वेळा पाहिलेले. त्यांचा व्हिसीडी संच घेतला होता. आता नाही आहे.

 

मग दुकानात 'गोलमाल', 'चष्मे बद्दूर', 'चुपके चुपके' ह्यासोबतच 'खट्टा-मिठा' हा चित्रपट मिळून चार चित्रपटांचा डिव्हीडी संच असलेला पाहिला. तो घ्यायचे ठरवले.


पण मग परवा नवीन काय आले आहे हे पाहण्यास दुकानात गेलो तिथे हा १२ विनोदी चित्रपटांचा नवीन संच दिसला "फूलटू कॉमेडी".


ह्यात होते:
'गोलमाल', 'चष्मे बद्दूर', 'चुपके चुपके',
'बावर्ची', 'सत्ते पे सत्ता',
'हेराफेरी', 'फिर हेराफेरी',
'नो एंट्री', 'हलचल', 'आवारा पागल दिवाना',
'धमाल', 'अजब प्रेम की गजब कहानी'

शेवटच्या ३ पैकी 'आवारा पागल दिवाना', 'धमाल', 'अजब प्रेम की गजब कहानी'. ह्यातील आवारा पागल दिवाना कधी तरी पूर्ण पाहिला होता. चांगला वाटला. पण एकदम नाही. 'धमाल', 'अजब प्रेम की गजब कहानी' मी पूर्ण पाहिलेले नाहीत. पाहताना बरे वाटले. चांगले आहेत असे ऐकले होते. पण बाकीचे ९ चित्रपट भरपूर वेळा पाहिलेले आणि आवडलेले. त्यांच्याबाबतीत तर काही म्हणालयाच नको. त्यामुळे रू. ९९९/- किंमतीच्या मानाने १२ चित्रपटांचा हा संच वाजवी दरात मिळतोय असे वाटले. लगेच खरेदी केला. (आणि कोणाला घ्यायचा असेल तर शेमारू च्या संकेतस्थळावरूनही मागवू शकता. किंमतही कमी. मला नंतर कळले :( )

कंटाळा आला की आता ह्यातील एखादा चित्रपट काढून पाहता येईल. :)


('नॉन स्टॉप कॉमेडी' आणि 'कॉमेडी क्लब'ची चित्रे शेमारू च्या संकेतस्थळावरून साभार.)

नोव्हेंबर ११, २०१०

त्रिमिती चित्रपटांशी माझी ओळख झाली १९८५ मध्ये, ’छोटा चेतन’ द्वारे.  आईस्क्रिम घेण्याकरीता हात पुढे करणे, इतर काही प्रसंगात दचकणे वगैरे अनुभव तेव्हाच मिळाले. त्यानंतर पाहिला ’शिवा का इन्साफ’. ’सामरी’ सिनेमा भुताचा असल्याने बहुधा वडिलांनी आम्हाला तेव्हा दाखवला नाही. :)


त्यानंतर नवीन चित्रपट आले नाहीत. पण काही वर्षांनी त्रिमिती चित्रांकित गोष्टीची पुस्तके (कॉमिक्स) आलेत. एका रद्दीच्या दुकानात आम्हाला ती पुस्तके दिसली. मग काय, जमतील तेवढी पुस्तके आणून वाचण्याचा कार्यक्रम झाला. नंतर आलेली ’छोटा चेतन’ची नवीन आवृत्ती हरीश आणि उर्मिला मातोंडकरला सोबत घेऊन. चित्रपटगृहात तर नाही पहायला मिळाली, नंतर एका दूरदर्शन वाहिनीवरच पाहिली. २००३ मध्ये आलेला ’छोटा जादूगर’ सिनेमा ही पुन्हा त्रिमितीच.


खूप वर्षांनी म्हणजे साधारण १८ वर्षांनी पाहिलेला. एवढ्या काळात तो अनुभव थोडाफार विसरून गेलो होतो. पण ह्या चित्रपटाने पुन्हा मजा आली. माझ्या निरिक्षणशक्तीने त्यातील फरक ओळखायचा प्रयत्न केला होताच. आधीचे त्रिमिती चष्मे हे निळ्या आणि लाल काचांचे (प्लॅस्टिक) चे बनविलेले होते. पण हे पूर्ण राखाडी रंगाचे होते. चित्रातही बदल होताच. नेमका काय बदल झाला तो तेव्हा शोधायचा प्रयत्न केला नाही, नंतर केला. पण ती माहिती मी येथे देत नाही. विकिपिडियावर फार चांगल्या रितीने दिले आहे ते. ;)


थोडे शास्त्र आणि तांत्रिक बाजू पाहताना मी वाचलेल्या ऐकलेल्या काही गोष्टी सांगतो. आपल्या दोन्ही डोळ्यांनी मिळून आपल्याला अंदाजे २०० अंशांपर्यंतचे दष्य दिसते आणि एका डोळ्याने फक्त १२० अंशांपर्यंत दिसते. अर्थात फक्त दृष्यविस्तार नव्हे तर दोन डोळ्यांमुळे त्रिमितीचा अनुभव ही येतो. एका डोळ्याने वस्तूची लांबी आणि रूंदी (किंवा उंची) दिसते तर दुसया डोळ्यामुळे त्या वस्तूची खोली किती आहे त्याचा अंदाज येतो. त्याचा फायदाच होतो. पण ह्यातच एक उलट गोष्ट आहे. सुईत दोरा टाकताना दोन डोळ्यांनी सुईतील छिद्राचा अंदाज येत नाही त्याकरिता आपल्याला एक डोळा बंद करून द्विमितीचा उपयोग करावा लागतो.


असो, शास्त्र बाजूला ठेवून इतर भाग. त्रिमिती चित्रपटांप्रमाणेच आणखी एक प्रकार फार पहायला मिळतो, तो म्हणजे होलोग्राम. एखादे चिन्ह किंवा चित्र त्रिमितीचा आभास निर्माण करून दाखवले जाते. हा प्रकार लहानपणी वापरलेल्या पट्ट्य़ांमध्ये ही पहायला मिळाला होता. पण मुख्यत्वे, एखादी वस्तू ओरिजिनल किंवा अस्सल आहे हे ओळखण्याकरीता उत्पादक आपल्या उत्पादनावर आपले मानकचिन्ह होलोग्राममध्ये बनवून चिकटवितात. आता जर नकली उत्पादकानेही तसाच होलोग्राम बनविला असेल तर त्यामध्ये अस्सल कोणते आणि नकली कोणते हे ओळखण्यात काही वेळा गल्लत होऊ शकते असे मला वाटते. :)


गेल्या वर्षी पुन्हा ३ त्रिमिती चित्रपट पाहिले. एक पूर्ण ऍनिमेशन (Ice Age 3), दुसरा मिश्र (G Force) आणि तिसरा संपूर्ण नेहमीसारखा (Final Destination 3D). ह्यातही दाखविले जाणारे चित्र तसेच चष्मा ह्यात बदल वाटला. तसेच भरपूर चित्रपट त्रिमितीमध्ये येत आहेत असे जाहिरातींत दिसले. एका मित्राने सांगितले की ते तंत्रज्ञान विकसित केल्याने त्रिमिती चित्रपट बनविणे थोडे सोपे झाले असल्याने धडाधड त्रिमित्री चित्रपट बनत आहेत. त्याचा फायदा आपल्यालाच.


त्यानंतर चर्चा वाढलीय त्रिमिती दूरदर्शन संचाची. एका संचासोबत १ ते २ त्रिमितीदर्शक चष्मे. कारण थेट त्रिमिती आभास तर मिळू शकत नाही. त्यामुळे चित्रपटगृहाचा अनुभव घरी एवढाच फरक असेल का? इतर देशांनंतर आपल्या देशात ह्याचे आगमन नेहमीपेक्षा लवकर झाले असे वाटतेय. ह्या दिवाळीत तर काय त्रिमित्री दूरदर्शन संच आणि LED संचांची भलतीच जास्त जाहिरात होत होती. आमचा घरचा दूरदर्शन संच बिघडण्याच्या मार्गावरच आहे. त्यामुळे एकाने सल्ला दिला, थोडे थांबून 3D संचच घे. पण मला तसे वाटत नाही. कारण एक तर त्याची किंमत भरपूर जास्त आहे. इतर देशांत तरी त्रिमिती वाहिन्या बनविणे चालू झाले आहे. पण भारतात तशा वाहिन्या बनण्याला बहुधा ३/४ वर्षे जातील असे मला वाटते. पण ज्याप्रकारे दूरदर्शन संच जरा जास्त वेगात भारतात आले त्याच वेगात वाहिन्याही आल्या तर काय सांगता येत नाही. असो. पण मी तरी सध्या त्रिमिती दूरदर्शन संचाच्या मागे नाही.


आता गेल्या महिन्यापासून त्रिमिती भ्रमणध्वनीची ही जाहिरात येत आहे. त्यात वापरायचा पडदा तसेच व्हिडियो त्रिमितीमध्ये दिसेल असा त्यांचा दावा आहे. मी तरी अजून तो भ्रमणध्वनी पाहिला नाही आहे. पण त्यात बिना चष्म्याने त्रिमितीचा अनुभव मिळणे कितपत शक्य आहे अशी शंका वाटते. अर्थात होलोग्रामप्रमाणे तर असेलच किंवा त्याहीपेक्षा भरपूर जास्त. पण तंत्रज्ञानाने आघाडी घेतली असेल तर चांगलेच आहे.


असो, आता एवढे त्रिमितीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाल्याने दर्शक आणि ग्राहक ह्यांना फायदा आहेच. आणखी काय काय पुढे येते ते पाहूच.

नोव्हेंबर ०६, २०१०

एवढी वर्षे  (छापिल) दिवाळी अंक वाचायची सवय असलेल्या मराठीजनांना गेल्या २/३ वर्षांपासून आंतरजालावरही दिवाळी अंक उदयास येत असलेले पाहिले असतील. ह्यावर्षी तर त्यांची रेलचेलच दिसत आहे.

कागदी पुस्तकांतील दिवाळी अंकांची किंमत वाढतच चालली असूनही त्यांची मागणी आणि खप तसाच टिकून आहे असे मला वाटते. त्याच जोडीला आता हे आंतरजालीय (इ) दिवाळी अंक ही आहेत.

बहुतेकांना ह्या अंकाची माहिती आणि संकेतस्थळ पत्ता माहित असेलच. तरीही ज्यांना माहित नसेल त्यांच्याकरीता ती यादी येथे देत आहे.
मी तरी अजून सर्व पाहिली नाही आहेत. काही चाळली आहेत. आता वाचावयास सुरूवात करेन. जमल्यास त्यांबाबतचे मतही लिहेन :)

जाता जाता: ह्यासोबतच मी वाचण्यास घेतलेल्या छापील दिवाळी अंकांचीही यादी लिहून देतो.
  • लोकप्रभा
  • आवाज
  • मौज
  • मस्त भटकंती
  • धनंजय
  • अक्षर
तुम्ही वाचलेल्या दिवाळी अंकाबद्दलही मत कळवावे.

ऑक्टोबर २३, २०१०

नगीना, निगाहें
स्टाईल, एक्स्क्युज मी
कोई मिल गया, क्रिश
धूम, धूम २
वास्तव, हथियार
सरकार,सरकार राज
फू़ंक, फूंक २

सर्व सिक्वेल... म्हणजे दुसर्‍या भागात कथा पुढे नेलेली.
'आंखे' चा दुसरा भाग येणार असे ऐकले होते. पण अजून काही बातमी आली नाही.

इंग्रजी चित्रपट भरपूर निघालेत. त्यांची नावे नकोत.

तसेच तेच कलाकार आणि तीच नावे घेऊन चित्रपट आलेत.
जसे 'मुन्नाभाई एम बी बी एस' आणि 'लगे रहो मुन्नाभाई'.
'गोलमाल', 'गोलमाल रिटर्न्स'
दोन भागांत कथा वेगळ्या, पण पात्रे तीच. त्यांची पद्धत तीच.

आता वरील पैकी मी फूंक चे दोनही भाग नाही पाहिलेत. बाकी सर्व चित्रपट पाहिलेत.

'स्टाईल' नंतर 'एक्स्क्युज मी' च्या वेळी एन. चंद्रा ह्यांनी सांगितले की त्या चित्रपटाचा तिसरा भाग काढणार आहेत.
'सरकार राज' नंतर राम गोपाल वर्माने सांगितले की 'सरकार' चा तिसरा भाग बनवणार आहेत.
'मुन्नाभाई चले अमेरिका' चे तर ट्रेलर पण २००७ पासून पाहत आहोत. (किंवा तेव्हाच पाहिले होते)

पण ह्या सर्वांत 'गोलमाल' ने बाजी मारली. त्यांचा 'गोलमाल ३' तयार होऊन आलाही. ५ नोव्हें ला प्रदर्शितही होणार आहे.
ह्याचे दोनही भाग चित्रपटगृहात पाहिले नाहीत. 'गोलमाल' व्हीसीडी आणून पाहिला. 'गोलमाल रिटर्न्स' डीव्हीडी वर.

आता ह्याचा तिसरा भाग कसा पाहू? चित्रपटगृहात की आधीप्रमाणे व्हिडीयो वर प्रदर्शित झाल्यावर? व्हीसीडी, डीव्हीडी नंतर नवीन पर्याय म्हणून 'ब्लू रे डिस्क' नका म्हणू. ;)

ऑक्टोबर १२, २०१०

कॉमनवेल्थ गेम्स अर्थात राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीयांची पदकांची लूट.
अरे वा.... सुरूवातीला इतर खेळाडूंची रहायची सोय नीट केली नाही. मग इतरही काही गोष्टींनी त्यांचे खेळापासून मन दूर ठेवले. भारतीयांना तर अशा वातावरणात रहायची सवयच आहे. मग त्यांनी नेहमीच्याच वातावरणात इतरांपेक्षा चांगला खेळ केला, आणि पदके मिळविली.

काय मस्त (खोचक) युक्तिवाद आहे ना? पण मला नेमके हे नाही म्हणायचे. हे तर काल कार्यालयात सहकार्‍याशी बोलताना सहज आलेले गंमतीचे विचार आहेत.

खरं तर चांगले वाटते. निदान सध्या भारत क्रिकेटशिवाय इतर खेळांमध्ये चांगली कामगिरी करीत आहे. :)
अर्थात २००६ मध्ये भारताने चांगली कामगिरी केली होती. त्याबाबतीत मला वाटलेले मी येथे लिहिले होते. मी लिहिले तेव्हा भारत ३र्‍या क्रमांकावर होता आणि स्पर्धा संपल्यावर भारत ४थ्या क्रमांकावर होता.
२००६ चा हा पदकतक्ता रेडिफच्या संकेतस्थळावरून.

Rank by Gold Country Gold Silver Bronze Total
1 Australia 84 69 68 221
2 England 36 40 34 110
3 Canada 26 29 31 86
4 India 22 17 11 50
5 South Africa 12 13 13 38
6 Scotland 11 7 11 29
7 Jamaica 10 4 8 22
8 Malaysia 7 12 10 29
=9 New Zealand 6 12 13 31
=9 Kenya 6 5 7 18
11 Singapore 5 6 7 18
12 Nigeria 4 6 7 17
=13 Wales 3 5 11 19
=13 Cyprus 3 1 2 6
=15 Ghana 2 0 1 3
=15 Uganda 2 0 1 3
=17 Pakistan 1 3 1 5
=17 Papua New Guinea 1 1 0 2
=17 Isle of Man 1 0 1 2
=17 Namibia 1 0 1 2
=17 Tanzania 1 0 1 2
=17 Sri Lanka 1 0 0 1
=23 Mauritius 0 3 0 3
=23 Bahamas 0 2 0 2
=23 Northern Ireland 0 2 0 2
=23 Cameroon 0 1 2 3
=23 Botswana 0 1 1 2
=23 Malta 0 1 1 2
=23 Nauru 0 1 1 2
=23 Bangladesh 0 1 0 1
=23 Grenada 0 1 0 1
=23 Lesotho 0 1 0 1
=23 Trinidad and Tobago 0 0 3 3
=23 Seychelles 0 0 2 2
=23 Barbados 0 0 1 1
=23 Fiji 0 0 1 1
=23 Mozambique 0 0 1 1
=23 Samoa 0 0 1 1
=23 Swaziland 0 0 1 1

सध्या भारत २र्‍या क्रमांकावर आहे. आणखी ३ दिवस आहेत. पहिला क्रमांक मिळविणे तरी शक्य दिसत नाही तरी भारताने दुसरे स्थान कायम ठेवावे अशी आशा आणि शुभेच्छा.
२०१० चा पदकतक्ता राष्ट्रकुल खेळांच्या अधिकृत संकेतस्थळावरून. (आतापर्यंतचा)
Rank Country Gold Silver Bronze Total
1 Australia 64 42 39 145
2 India 31 25 28 84
3 England 28 49 36 113
4 Canada 23 15 29 67
5 South Africa 12 11 9 32
6 Nigeria 8 7 11 26
6 Kenya 8 6 7 21
8 Malaysia 7 8 8 23
9 Singapore 6 5 6 17
10 Scotland 5 8 7 20
11 Samoa 3 0 1 4
12 New Zealand 2 17 6 25
12 Jamaica 2 3 1 6
12 Pakistan 2 1 2 5
12 Cyprus 2 0 1 3
12 Uganda 2 0 0 2
17 Wales 1 5 10 16
17 Bahamas 1 1 3 5
17 Nauru 1 1 0 2
17 Botswana 1 0 3 4
17 Cayman Islands 1 0 0 1
22 Trinidad and Tobago 0 2 2 4
22 Cameroon 0 1 3 4
22 Northern Ireland 0 1 1 2
22 Sri Lanka 0 1 1 2
22 Seychelles 0 1 0 1
22 Papua New Guinea Rodrigues 0 1 0 1
22 Saint Vincent and the Grenadines 0 1 0 1
22 Ghana 0 0 3 3
22 Mauritius 0 0 2 2
22 Tonga 0 0 2 2
22 Isle of Man 0 0 2 2
22 Namibia 0 0 2 2
22 Saint Lucia 0 0 1 1
22 Bangladesh 0 0 1 1
22 Guyana 0 0 1 1
N/A Montserrat 0 0 0 0
N/A Mozambique 0 0 0 0
N/A Gibraltar 0 0 0 0
N/A Guernsey 0 0 0 0
N/A Barbados 0 0 0 0
N/A Belize 0 0 0 0
N/A Bermuda 0 0 0 0
N/A Dominica 0 0 0 0
N/A Grenada 0 0 0 0
N/A Falkland Islands 0 0 0 0
N/A Fiji 0 0 0 0
N/A Gambia 0 0 0 0
N/A Maldives 0 0 0 0
N/A Malta 0 0 0 0
N/A Kiribati 0 0 0 0
N/A Lesotho 0 0 0 0
N/A Malawi 0 0 0 0
N/A British Virgin Islands 0 0 0 0
N/A Brunei 0 0 0 0
N/A Niue 0 0 0 0
N/A Norfolk Island 0 0 0 0
N/A Saint Helena 0 0 0 0
N/A Saint Kitts and Nevis 0 0 0 0
N/A Sierra Leone 0 0 0 0
N/A Vanuatu 0 0 0 0
N/A Solomon Islands 0 0 0 0
N/A Swaziland 0 0 0 0
N/A Tanzania 0 0 0 0
N/A Tokelau 0 0 0 0
N/A Turks and Caicos Islands 0 0 0 0
N/A Tuvalu 0 0 0 0
N/A Cook Islands 0 0 0 0
N/A Anguilla 0 0 0 0
N/A Antigua and Barbuda 0 0 0 0
N/A Jersey 0 0 0 0
N/A Yemen 0 0 0 0

आणि हो, सर्व विजेत्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन. 

(ता. क. तक्त्यांतील लेखन मराठीत मिळाले नाही आणि भाषांतर करण्यास टाळले)

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter