सविस्तर लेख/चर्चा: मनोगत येथे. दि: ७ जून २००५.
चित्रपट आणि आपण
१ जूनला वर्तमानपत्रात बातमी वाचली. १ ऑगस्ट पासून चित्रपट, धारावाहिकांमध्ये धुम्रपानास बंदी.
जरा बरे वाटले, की सरकार धुम्रपानाविरुद्ध जागरुकता वाढवित आहे. पण वाटले की ह्याचा किती फायदा होईल? थोडा विचार केल्यानंतर जाणवले की चित्रपटांचा समाजावर परिणाम होतोच. तेव्हाच वाचण्यात आले मटा.
१. हर फिक्र को धुएं में...
२. धुम्रपान दृष्यबंदी निर्णयामुळे चित्रपटसृष्टी संतप्त .
बरोबरच आहे म्हणा. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सिगरेट ओढण्याचे चित्रपटांमधून फारसे समर्थन कधी झाले नाही. पण तरीही त्याविरोधातही जास्त काही घडले नाही. एखाद्याला व्यसनापासून मुक्त करणारे नायक नायिका फारच क्वचित दिसतात. पण पिणारे खूप दिसतात. आपण म्हणतो की चित्रपट हे प्रथमतः मनोरंजनाकरीता बनतात. (अपवादः काही चित्रपटांपासून खुप काही शिकण्यासारखे असते) पण चित्रपटांचा काही वेळा फक्त मनोरंजन म्हणून उपयोग होत नाही. लोक(मुख्यत्वे तरूण आणि लहान मुले) त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. एकतर्फी प्रेमप्रकरणातून झालेला हिंसाचार हे बहुधा त्याचाच परिणाम असावा. आणखीही बरेच प्रकार असतील.
मी चित्रपटांच्या विरोधात हे लिहीत नाही आहे. उलट मीही खूप चित्रपट पाहतो. ते तर माझे मनोरंजनाचे एक साधन आहे. मी ही काही वेळा ते डोक्यावर घेतले आहेत. पण मला जाणीव आहे की सर्व काही प्रत्यक्षात घडत नसते.
सिनेमाला सेन्सॉर बोर्ड एक प्रमाणपत्र देतेच की. ( ते किती उपयुक्त आहे हा वेगळ्या वादाचा विषय आहेः-) )
आता काय बघावे आणि काय बघू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आजकाल हिंदी चित्रपटाच्या नायक नायिकांना आदर्श मानले जाते. "तो सिगरेट पिताना छान दिसतो, मीही प्रयत्न करतो. त्याने मुलगी पटविली तशी मीही पटवीन." आता हे आचरणात आणावे की नाही हा विचार ज्याचा त्याने करावा. मुलगी मिळाली नाही म्हणून दारू पिणे किंवा जीव देणे हे आता सामान्य/नित्याचे झाले आहे. पण आधी सांगितल्याप्रमाणे काही अपवाद असतात. उदा. 'आनंद.' हा चित्रपट माणसाला जगण्याची एक उमेद देतो. हल्लीचाच 'क्या यही प्यार है' हाही चित्रपट सांगतो हेच सांगतो की प्रेम हेच आयुष्यात महत्वाचे नाही.
हा लेख लिहिण्याचा मूळ उद्देश हाच की चित्रपटाचा आपल्यावर होणार परिणाम हा कसा असावा? आपण ते कोणत्या प्रकारे हाताळावेत? ह्यावर आपणा सर्वांची प्रतिक्रिया मिळेल ही अपेक्षा.
आणखी, सर्व काही चित्रपटांमुळेच घडते असे नाही. त्याला आणखी काही गोष्टीही जबाबदार असतील.
नोव्हेंबर ०४, २००७
नोव्हेंबर ०४, २००७ १०:४३ PM
देवदत्त
0 प्रतिक्रिया
Related Posts:
निवडणुकीचे लघुसंदेश गेला महिनाभर निवडणूकीबद्दलचे SMS येत होते. "Save Thane","Vote for XXXXX","Don't vote for XXXXX" वगैरे वगैरे. वैताग आला होता त्या SMS चा. तसेच बाकीचे जाहिरातींचे SMS ही होतेच, ज्याला आपण टेलिमार्केटींग म्हणतो त्या प्रकारचे. D… Read More
मर्फीच्या नियमांच्या धर्तीवर एक नियम If anything can go wrong, it will - Murphy's Law. तुम्हाला सर्वांना मर्फीचे नियम माहित असतीलच. त्याच धर्तीवर मी एका नियमाची प्रचिती गेल्या १ वर्षापासून घेत आहे. त्याबाबत थोडेसे. सकाळी कार्यालयात जाण्याकरीता कार्यालयाची बस व… Read More
गल्लीत नुसता गोंधळ.. दिल्लीत मुजरा नाहीच. गेले २ आठवडे 'गल्लीत गोंधळ.. दिल्लीत मुजरा' ह्या चित्रपटाच्या जाहिराती पाहत होतो. काल हा सिनेमा प्रदर्शित झाला. आज वेळ जमून आल्याने हा सिनेमा पहावयाचे ठरविले. आज सकाळी फोनवरून सिनेमाचे तिकीट काढून ठेवले. वाटले आज शनिवार आहे,… Read More
भटकंती (ठाणे ते शेगाव) मागील वर्षी ऑगस्टमध्ये आमचे शेगावला जायचे ठरले होते. पण भरपूर पाऊस असल्याने जायचे टाळले होते. नंतर मला कामातून वेळ मिळत नसल्याने ह्याबाबत जास्त विचार करता आला नाही. आता १० एप्रिलला गुडफ्रायडे, शनिवार व रविवार असे ३ दिवस सुट्… Read More
भटकंती (शेगाव-आनंदसागर) ह्या आधीचे: भटकंती (ठाणे ते शेगाव) शेगावला पोहोचल्यानंतर पहिले गेलो ते भक्त निवास क्र. ५ कडे. भक्त निवास क्र. ३ ते ६ हे चार बाजूंना बांधून मध्ये मोकळी जागा ठेवली आहे. तिथूनच आनंद सागर करीता शेगाव संस्थानाचा बस थांबा आहे.… Read More
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा