जुलै ३१, २००८

मी आतापर्यंत ऐकलेल्या हिंदी सिनेमाच्या नावांत ’मां’ हे सर्वांत लहान व ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ हे सर्वांत मोठे नाव आहे. यात ’मां’ नावाचे ३ सिनेमे येऊन गेले. ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ एकच( ह्या नावाचा सिनेमा पुन्हा बनविणार कोण आणि पाहणार कोण आज काल ;) ) नंतरही मोठ्या नावाचे सिनेमे येऊन गेले उदा. ’पाप को जलाकर राख कर दूंगा’, ’जुल्म को जला दुंगा’ वगैरे. ते काही जास्त चालले नाहीत. पण नंतर ’हम आपके हैं कौन’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे जरा मोठ्या नावाचे सिनेमे आले जे भरपूर चालले. त्यामुळे तेव्हाही जरा मोठ्या नावाचे सिनेमे काढायची लाट आली. गेल्या काही वर्षांत लहान दोन अक्षरी नावाचेही भरपूर सिनेमे येत गेले. सध्या तर इंग्रजी नावाच्या हिंदी सिनेमांचेही चलन आहे.

तरीही ह्या सर्वात ’हम आपके हैं कौन’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ जास्त लक्षात राहतात. नुसते चांगले आणि लांब नावाचे सिनेमे म्हणून नव्हे, तर त्यांच्या लांबीमुळे सुद्धा. हिंदी (व मराठीही) सिनेमाची लांबी साधारणत: २:३० तास असते व इंग्रजी सिनेमे १:३० ते २:०० तासांचे असायचे. पण ह्याला अपवाद असणारे हे दोन सिनेमे. हम आपके हैं कौन - ३:४५ तास, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे - ३:१५ तास. आणखी काही अपवाद म्हणजे संगम (४ तास), शोले (३:३० तास) व लगान(३:४५). मुख्य म्हणजे हे सर्व सिनेमे तुफान चाललेत. पण म्हणून प्रत्येकाने मोठ्या लांबीचे सिनेमे बनविण्याचा प्रघात नाही आला.

आणखी एक प्रकार जो इंग्रजी सिनेमांतून आला. सिक्वेल. सिनेमाचा पुढील भाग काढणे. ’नगीना-निगाहें’, ’वास्तव-हथियार’, ’स्टाईल-एक्सक्यूज मी’. नुकतेच आलेले ’हेराफेरी- फिर हेराफेरी’ आणि ’सरकार-सरकार राज’. मी ऐकल्याप्रमाणे एन चंद्राने ’स्टाईल-एक्सक्यूज मी’ सोबत तिसरा सिनेमा काढणार आहेत. तसेच ’फिर हेराफेरी’ ही शेवटी असा अडकवून ठेवला आहे की त्यातून पुढे कथा चालू करू शकतात. २००२ मध्ये आलेल्या ’आंखे’चे ही दोन शेवट आहेत. जेणेकरून अर्धवट ठेवलेल्या प्रसंगापासून पुढील सिनेमा चालू करता येईल.

तरी आता लहान लांबीचे सिनेमे बनविणे हे ही जरा फॅशनमध्ये आहे.१:३० तास ते २ तासाचे. तरी हे सर्व एकाच कथेची लांबी होती हो. त्यात मग नवीन प्रकाराची भर घातली राम गोपाल वर्माने. सिनेमा ’डरना मना हैं’. ह्यात वापरल्या सहा कथा. तीन कथालेखक, एक दिग्दर्शक. मग त्याला छेद दिला त्यानेच. ’डरना जरूरी है’. सहा कथा, सात दिग्दर्शक. पण त्या प्रकारातही जास्त कोणी हात मारायचा प्रयत्न नाही केला. ह्यामागचे कारण बहुधा असेल की ते चालले नाहीत. तरी ह्याच प्रकारात मागील वर्षी आला ’दस कहानियां’. १०-१२ मिनिटांच्या कथा. हा सिनेमा मी परवा पाहिला टीव्ही वर. पूर्ण नाही पहायला मिळाला. पण एक फायदा आहे. वेगवेगळ्या कथा असल्याने पुन्हा पाहताना कुठल्याही कथेपासून सुरूवात करू शकतो. ;)

असो, हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे आज एका वाहिनीवर नवीन हिंदी सिनेमाची माहिती पाहिली. ’मुंबई कटींग’ नावाचा नवीन सिनेमा येणार आहे. त्यात ११ लघुकथा आहेत. ११ दिग्दर्शक. जवळपास १० मिनिटांची एक कथा, म्हणजे ११० मिनिटे म्हटले तर चित्रपटगृहात जास्तीत जास्त २ तास.

चला पाहूया, हा सिनेमा काय बदल घडवून आणतो ते.

1 प्रतिक्रिया:

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter