फेब्रुवारी ०६, २०११

दिलेल्या पत्त्यावर नीट पोहोचणे म्हणजे एक कसरतच आहे. तरी अजूनही मोठ्या शहरांतच जाणे झाले आहे. मी इथे आधी सांगितल्याप्रमाणे मला पत्ता लवकर मिळत नसेल :) पण महामार्गावर कुठे वळून कुठे जाता येते याबाबत तरी नीट फलक लावावेत की जाणार्‍याला रस्ता नीट कळेल.



आज पनवेलच्या पुढे गेलो होतो कर्नाळ्याला. पण पनवेल वरून गोवा महामार्गावर जाण्याकरीता मुख्य रस्त्यावर डोक्यावर फलक लावून ठेवला आहे, पणजीम् ->. तिकडे वळून सरळ गेलो. पुढे गेल्यावर पाहिले तर मुंबईकडे जाणारा रस्ता. मध्ये पेट्रोलपंपावर विचारून परत त्याच रस्त्यावर आलो. पुन्हा उजवीकडे वळून थोडे पुढे गेलो तर डाव्या बाजूला जो रस्ता जातो त्या कोपर्‍यात डाव्या बाजूला फलकामध्ये लिहून ठेवले आहे, <- पणजीम् (की गोवा?). अरे, गोवा हे किती मोठे/प्रसिद्ध ठिकाण आहे आणि तिकडे जाण्याचा फलक असा लहानसा आणि कोपर्‍यात? (आधी गेलो होतो त्या रस्त्यावर मुंबई/उरण वगैरे मोठ्या अक्षरात डोक्यावर लिहून ठेवले आहे)


३/४ वर्षांपुर्वी एका हिंदी वृत्तवाहिनीवर दाखवले होते की काही शहरांमध्ये हे असे फलक कसे चुकीने लावले आहेत. उदा. एका ठिकाणी जाण्याचे अंतर जर ५० किमी असेल तर पुढे काही अंतरावर तेच अंतर वाढवून ७० किमी वगैरे दाखवले होते.

तरी बरे, भरपूर ठिकाणी असे चुकलो तर पुढे जाऊन यु टर्न घेऊन परत तरी येता येईल पण काही ठिकाणी ती ही सोय नाही आहे.

फेब्रुवारी ०४, २०११

वाहने वाढलीत, गर्दी वाढली, रस्ते भरून गेले. पुढे जायची सर्वांनाच घाई.
पण म्हणून स्वत: वाहन चालवताना रूग्णवाहिकेला तरी रस्ता द्यावा असेही वाटू नये लोकांना?

(आता सविस्तर लिहिणार होतो. पण उद्या लिहितो)

फेब्रुवारी ०३, २०११

गेल्या शनिवारी पुण्याला गेलो होतो, तेव्हा संध्याकाळी शनिवारवाड्यात जाऊन आलो. इतके वर्षे त्याबद्दल ऐकले होते, आत गेलो नव्हतो. पुण्याच्या फेरीत तिकडून जाणेही होत असेल. एक वर्ष पुण्यात राहिलो तेव्हाही वाडा आतून पाहणे झाले नाही.

पण ह्यावेळी आत गेलो. वाटले थोडी नवीन माहिती मिळेल. खालून वाडा पहायला थोडे बरे वाटत होते. मोठ्या मोठ्या पायर्‍यांवरुन पहिल्या मजल्यावर गेलो. त्या पायर्‍या चढताना वाटत होते त्या काळच्या बलाढ्य आणि उंचपुर्‍या माणसांकरीताच ह्या पायर्‍या बनविल्या असतील.

वर जाऊन एका जागेवर सहज एक फोटो काढून घ्यायचा म्हणून उभे राहिलो.
पण सर्व अपेक्षा भंग पावल्या. तिथून खाली पाहिले तर दिसले की त्या जागेचे पूर्णपणे सार्वजनिक उद्यान झाले आहे. महाल/वाड्याबद्दल काही उरले आहे असे वाटतच नव्हते. मग असेच पूर्ण भिंतीवरून एक फेरी मारली. उरलेल्या वाड्याची देखरेख करणे बहुधा महानगरपालिकेला जड जात असावे.

खाली येऊन वाड्याच्या माहितीबद्दल जे काही एक दोन फलक लावले होते तेच वाचून काढले.
ते हे फलक.

फलक वाचताना एक गंमत दिसली ती आताच्या सरकारच्या निष्काळजी कारभाराचेच एक उदाहरण वाटली. एका फलकावर वाड्याचा खर्च दाखवलाय १६११० रुपये तर त्याच्या बाजूच्याच दुसर्‍या फलकावर खर्च दाखवलाय १६१२० रूपये. (तेव्हाच्या नाही म्हणत मी... आताच्या सरकारने इथेही घपला केला? २८० वर्षांपुर्वीचे १० रू म्हणजे आजचे किती? :) )

गंमत सोडा. पण इतर गोष्टीही नीट नाही वाटल्या त्या म्हणजे वाडा तर सोडा पण तिथे लावलेल्या फलकांचीही देखरेख नीट होत नाही असे वाटते. त्यावर लिहिण्यासाठी वापरण्यात आलेला काळा रंग ही उडत चालला आहे. आता ५ रू तिकिटात काय काय करणार असा प्रश्न विचारतील. तिकीटाचा दर वाढवला तर लोक येणे बंद करतील ही भीती ही असेल. पण इतिहासातील काही गोष्टींवर वाद घालून, काही कृती करून जो गोंधळ होतो त्यात जेवढा पैसा खर्च होतो तो इथे वापरा की.

असो. तुम्हाला हे लेखन त्रोटक वाटत असेल पण त्याबद्दल आणखी काही खास लिहिण्यासारखे मला आत्ता तरी वाटले नाही कारण मलाच तो वाडा पाहताना एवढी अपेक्षापूर्ती झाल्यासारखे वाटले नाही. आता मी ही धावती भेटच म्हणेन. कोणी इतिहासाची माहिती सांगत माझ्यासोबत येत असेल तर पुन्हा येईन.

जाता जाता: त्या वाड्याचे जे तिकिट आहे त्यावर सर्व हिंदी आणि इंग्रजीत लिहिले आहे. (चित्र लवकरच स्कॅन करून टाकतो येथे.)

नेहमी मराठी मराठी करण्यार्‍या तसेच इतिहासाचा बाणा सांगणार्‍या
राजकीय पक्षांनी इथेही लक्ष द्यावे की जरा.

फेब्रुवारी ०२, २०११


पुन्हा गाजावाजा करत असलेला शाहरूख खानचा 'जोर का झटका' हा कार्यक्रम एनडीटीव्ही इमॅजिनवर आज चालू झाला. त्याच्या All Out .. Total Wipe Out ह्या वाक्यावरून मला अंदाज आला होता की तो बिन्दास, डिस्ने, ए एक्स एन (AXN) वरील खेळांच्या कार्यक्रमांप्रमाणे असेल. आणि आताच त्याचे पहिले प्रक्षेपण पाहिले. तो कार्यक्रम तसाच आहे.

बायकोने विचारले "हा कार्यक्रम चालेल का?" मी म्हटले, "नाही. आणि ह्यात शाहरूख चे जास्त काम नसेल." तेव्हा आणखी एक लक्षात आले. शाहरूख खानचे कौन बनेगा करोडपती ३, क्या आप पांचवी पास से तेज है हे कार्यक्रम तर चालले नाहीत. आता हा तिसराही बहुधा चालणार नाहीच. (कधीतरी पहिल्यांदाच अशी तात्काळ समिक्षा करत आहे ;) ). पहिले दोन कार्यक्रम तरी थोडेफार पहावेसे वाटत होते. हा मी ही बहुधा पाहणार नाही.

ज्या लोकांना शाहरूख खान आवडत नाही त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतील ते जाणतो. मलाही ह्याबद्दल आवर्जून लिहावे असे नव्हते. पण काहीतरी चांगले कार्यक्रम दूरदर्शन वर असावे वाटत असताना, असे कार्यक्रम सुरू झाल्याने मनात आले ते लिहून टाकले :)

(चित्र जोर का झटकाच्या संकेतस्थळावरून)

फेब्रुवारी ०१, २०११



गेले काही महिने सेवेत नसलेले 'साहित्यविश्व' संकेतस्थळ पुन्हा आपल्या सेवेत हजर झाले आहे. जुन्या सदस्यांचे खाते आणि विदा पूर्णपणे सुरक्षित आहे आणि सदस्य तेच खाते वापरून साहित्यविश्वात पुन्हा सहभागी होऊ शकतात.

संकेतस्थळ पुन्हा सुरू झाले असले तरी काही दिवस चाचणी अवस्थेत ठेवण्याचा विचार आहे. सदस्यांना विनंती आहे की त्यांना जाणवणाऱ्या अडचणीबद्दल त्यांनी vyavasthapak(at)sahityavishwa(dot)in ह्या पत्त्यावर विपत्राने कळवावे.

संकेतस्थळाचा पत्ता: www.sahityavishwa.in

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter