क्रिकेट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
क्रिकेट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मार्च १७, २०१६


दरवर्षीप्रमाणे पुन्हा 'पृथ्वीकरिता एक तास' अर्थात 'अर्थ अवर' ची चाहूल लागली आहे. १९ मार्च रोजी रात्री ८:३० ते ९:३० दरम्यान आपण वीजेची उपकरणे बंद करून वीज वाचवावी जी पृथ्वीकरीता उपयोगी पडेल असा त्यामागील हेतू आहे.

२००९ मी ही हे पाळून त्याबद्दल येथे लिहिले होते. मधली वर्षे त्याबद्दल जास्त रस दाखविला गेला होता की नाही सध्या आठवत नाही.

आता ह्या वर्षीही त्याबद्दल बोलले जात आहे. कार्यालयातही ह्याबाबत ईमेल येत आहेत. कंपनीच्या अंतर्गत संकेतस्थळावरही त्याबद्दलची चर्चा सुरू आहे. विविध देशांतील आमची कार्यालये हे पाळतील असे म्हटले आहे. भारतातील कार्यालयातही हे पाळले जाईल. अर्थात शनिवारी कार्यालयीन सुट्टी असल्याने त्याचा एवढा प्रभाव पडेल असे वाटत नाही. पण तरीही चांगले आहे. निदान खाजगी कंपन्या, इतर काही देशांतील काही लोक ते पाळतील असा अंदाज आहे.

पण भारतात इतर ठिकाणी ह्याचा प्रभाव किती असेल? मला तरी शंका आहे. लोकांच्या एकूण हेतूबद्दल नाही. काही लोक पाळत असतील हे, जरी सर्व नाही. पण शंका येण्याचे दुसरे मोठे कारण आहे की, १९ मार्चला संध्याकाळी ७:३० वाजता टी२० विश्वचषकाचा भारत वि. पाकिस्तान सामना आहे. आता भारत-पाकिस्तान सामना म्हटला की आधीच लोकांना उत्साह आलेला असतो, त्यात विश्वचषकाचा सामना. मग घरात तर काय बाहेरही वीज बंद होणार नाही. बहुधा जास्त टीव्ही व प्रोजेक्टर वापरले जातील.

म्हणजेच ह्यावेळी भारतात तरी अर्थ अवर ला जास्त पाठिंबा मिळणार नाही असे वाटते.

एप्रिल ०३, २०११


क्रिकेट विश्वचषक २०११ जिंकणाऱ्या भारतीय संघाचे आणि चाहत्यांचे अभिनंदन :)


मार्च २९, २०११




भविष्य : भारत वर्ल्डकप जिंकणार!


चढतोय वर्ल्डकप फीवरचा पारा
भारत-पाकिस्तान उपांत्य सामन्याच्या निमित्ताने संपूर्ण देश क्रिकेटमय झाला असून देशातील बहुतांश कंपन्यांमध्ये बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
विविध राजकीय विचारधारांमध्ये गुरफटलेले मध्य प्रदेश विधानसभेतील आमदार सोमवारी आपापसातील मतभेद विसरून एका मागणीसाठी खांद्याला खांदा लावून सरसावले. त्यांच्या या मागणीपुढे विधानसभा अध्यक्षांनाही नमते घ्यावे लागले. ही मागणी होती, बुधवारी, ३० मार्च रोजी विधानसभेचे कामकाज अर्ध्या दिवसानंतर बंद ठेवण्याची.

सामना :
मॅच बघण्यासाठी आमदारांना हवी अर्धा दिवस सुट्टी
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना सर्व आमदारांना पाहायला मिळावा म्हणून विधिमंडळाचे त्या दिवशीचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत संपविण्यात यावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आज केली. संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांची ही मागणी सरकारला मिळाली आहे, असा दुजोरा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला.

महाराष्ट्रातील मंत्र्यांना हवेत क्रिकेट पास
विश्‍वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामना पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यात मग आपले महाराष्ट्रातले नेते तरी मागे का राहातील. म्हणूनच, महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांनी हा सामना पाहण्यासाठी सरकारकडे पासची मागणी केली आहे.

येत्या बुधवारी मुंबई बंद!

क्रिकेटसाठी ऑपरेशन पुढे ढकलले

हे तर नमुन्यादाखल काही आहे. मी पाहिलेल्या वृत्त संकेतस्थळांवरील भातातील एक शित.

स्टार माझा वर एक बातमी दाखवत होते त्यात सर्व खेळाडूंना देवांच्या तसबिरीत बसविले आहे. त्यांच्या चित्राचे पूजन करत असतील तरी जास्तच वाटते. पण इथे तर हिंदू देवतांच्या प्रतिमेतील चेहऱ्यात त्यांचे चेहरे बसवले होते.
इथे त्या तथाकथित देव मानणाऱ्या लोकांना राग येत नाही?

गेल्या वेळी २ एकदम विरुद्ध छायाचित्रे एकत्र ओर्कुट वर पाहिली होती. एकात भारतीय क्रिकेट खेळाडूंची पूजा करत आहेत. बाजूच्याच छायाचित्रात भारत सामन्यात हरल्यामुळे खेळाडूंच्या घरावर दगडफेक की काळे फासत असल्याचे.  आता शोधूनही मिळाली नाहीत ती चित्रे.

अति होतंय आता. क्रिकेट मलाही आवडायचं. पण ह्याच अतिरेकामुळे ते नावडते झाले आहे.

फेब्रुवारी १८, २०११

विश्वचषकाकडे दुर्लक्ष करायला मदत करा रे. ह्या लोकांप्रमाणे माझ्याही भावना उतू जात आहेत. म्हणून न लिहायचे, बोलायचे ठरवूनही लिहावे लागतेय.

Either you love it or you hate it. But you can't ignore it. असे झालंय माझं. ;)

द्वारकानाथ संझगिरींचे लेखन म्हणून वाचायला गेलो. त्यांनी लिहिलं चांगलं नेहमीप्रमाणे, वाक्येही मस्त आहेत. पण मूळ मुद्दाच चुकीचा वाटला. १९८३ वर्ल्डकप जिंकला होता तो सावरकरांकरीताही असेलच की.
http://www.saamana.com/2011/February/18/Link/Main1.htm

आणि दुसरे हे.
हिंदुस्थानचेच नाव वर्ल्ड कपवर कोरण्यासाठी देव पाण्यात ठेवायचे की वर्ल्ड कप घेऊन आलेल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी पास कर असे साकडे देवाला घालायचे हेच विद्यार्थ्यांना कळेनासे झाले आहे
http://www.saamana.com/2011/February/18/Link/Main2.htm
काही पण..
त्या विद्यार्थ्यांना म्हणावे, "आता परीक्षा न देता वर्ल्ड कप वर लक्ष द्यावे. वर्ल्ड कप चार वर्षांत एकदा होतो. दहावी-बारावीची परीक्षा काय ६-६ महिन्यांनी होतच असतात."

वृत्तवाहिन्या, क्रिडावाहिन्यांकडे तर मी दुर्लक्ष करू शकतो. पण जे काही आवर्जून पाहतो त्यातही ह्याबाबत काही असले तर आणखी वैताग.
आवडीची मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' पाहतोय तर त्यातही आहेच. बरं
असेल तर असू द्या पण कैच्याकै चाललंय. भारत जिंकण्यासाठी होमहवन चाललंय.
 

इतरही मालिकांमध्ये सुरु होईल, झाले असेलच. :(

फेब्रुवारी १७, २०११

आज कार्यालयातून घरी येण्यास ३५-४० मिनिटे लागली. दररोज हमखास ६० ते ७५ मिनिटे लागतात. मनात लगेच विचार आला, क्रिकेट विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा पाहण्यास तर लोक लवकर घरी गेले नसतील?


सकाळी गर्दी नसली तरी सकाळी २०-२५ मिनिटे लागतात. त्यामानाने ४० मिनिटे म्हणजे जास्तच झालीत. पण तो अतिरिक्त वेळ लागला ट्रकमुळे. त्या लोकांना रस नसेल ना क्रिकेटमध्ये.
विश्वचषकाच्या सामन्यांनाही असेच लोक लवकर घरी जाऊ देत. निदान मी थोडा उशीरा निघूनही रस्त्यात मला जास्त वेळ लागणार नाही ;)

विश्वचषकाबद्दल किंवा मुख्यत्वे क्रिकेटबद्दल माझे मत मी लवकरच लिहेन. 

नोव्हेंबर २२, २००९

लोकप्रभामधील राजू परूळेकरांचे 'अल्केमिस्ट्री' वाचले. नुकत्याच चाललेल्या 'मराठी/महाराष्ट्रीय आणि सचिन' वादात त्यांनीही आपले हात धुवून घेतल्यासारखे वाटले, तेही 'सचिन' हे चलनी नाणे वापरून. वास्तविक मला त्यांचे मुद्देच पटले नाहीत. क्रिकेटविरोधात लिहायचे तर लिहा किंवा माध्यमांनी क्रिकेटला अवास्तव महत्व दिले म्हणून माध्यमांबद्दल लिहा की. उगाच सचिनला का त्यात ओढता? तुम्ही म्हणता तसे त्याने केले नसेल तरी त्याने बिघडवले काय?
असेच विचार मनात येत असताना, मराठीब्लॉग्स.नेट वर त्याच संबंधी लेख वाचले. त्यातील काही.
ह्यातील भरपूर प्रतिक्रिया पटल्या. त्यात हेरंब ह्यांचे अल्केमिस्ट् उवाच.. बदनाम हुए तो क्या नाम तो हुआ !! हे जास्त.

फक्त मला आणखी एक प्रश्न विचारावासा वाटतो.

परूळेकरांनी इतर दाखले देऊन सचिनने काय केले हा प्रश्न केलाय. पण त्यांनी स्वत:च्या अल्केमिस्ट्री ह्या लेखात फक्त राजकीय नेत्यांबद्दल (व एखाद दोन इतर लोक) लिहिलेय. दाखले दिलेल्या लोकांबद्दल त्यांनी स्वतः लिहिले असते तर आम्हालाही विचार करता आला असता.
पण त्यांनी माध्यमांच्या लोकांना ज्याप्रकारे दोष दिलेत त्याप्रमाणे स्वत:ही प्रसिद्ध नेत्यांवर लिहिण्यात पाने खर्च केलीत. जे इतर भरपूर ठिकाणी वाचायला मिळते त्यांच्याबद्दलच लिहून त्यांनी महाराष्ट्राकरीता काय केले? :)

नोव्हेंबर ०५, २००९

  • सचिन तेंडुलकरचा १७००० धावांचा विक्रम. १४१ चेंडूत १७५ धावा. सचिनचे अभिनंदन.
  • सचिन बाद झाल्यावर भारताचा डाव गडगडला. भारत ३ धावांनी पराभूत. इतिहासाची पुनरावृत्ती.
सचिन तेंडुलकरची तुलना डॉन ब्रॅडमन ह्यांच्याशी केली जाते. हे चांगलेच आहे. दुमत नाही .पण ह्याबाबत काही वर्षांपुर्वी शिरीष कणेकरांनी वृत्तपत्रातील एका लेखात लिहिलेले वाक्य आठवले.
"असे म्हणतात की ब्रॅडमन तुमच्या संघात असताना अगदी वाईटात वाईट स्वप्न पडले तरी सामना हरल्याचे स्वप्न पडणार नाही . पण सचिनबाबत हे आपण म्हणू शकत नाही."
सचिनच्या खेळीवर माझी टीका नाही. पण संघाची साथ बहुधा मिळत नाही. त्यामुळेच त्या वाक्याची प्रचिती पुन्हा दिसली.

मार्च २२, २००९

[आय.पी.एल चे सामने भारताबाहेर खेळावयाचे ठरविले गेले त्याच दिवशी मी हे प्रश्न माझ्या अनुदिनीवर लिहिले होते आणि ते मिसळपाव.कॉम तसेच मनोगत.कॉम वरही प्रकाशित केले होते. पण मध्येच पडलेल्या संभ्रमामुळे आणि क्रिकेट तसेच राजकारणावर लिहू नये असे वाटल्याने मी ते सर्व ठिकाणहून काढून टाकले. पुन्हा वाटले की क्रिकेट राहू द्या पण आपल्याशी निगडीत असलेल्या गोष्टींबाबत हे प्रश्न असल्याने पुन्हा माझ्या अनुदिनीवर प्रकाशित करत आहे.  हे लिखाण (निदान इतर संकेतस्थळांवर) अचानक अप्रकाशित का झाले ह्या बाबत कोणास प्रश्न पडल्यास उत्तर म्हणून हे निवेदन. ज्यांनी माझ्या प्रश्नांवर प्रतिक्रिया लिहिल्या होत्या त्यांचे आभार. :) ]
नुकत्याच आलेल्या बातमीनुसार आय.पी.एल. अर्थात IPL चे T20 सामने भारताबाहेर खेळवण्याचे ठरविले आहे.
ह्या मागील कारण हेच की लोकसभा निवडणुकाही त्याच काळात होत असल्याने सामन्यांच्या दरम्यान सुरक्षितता देणे पोलिसांना कठीण आहे व बहुतेक राज्य सरकार तसेच पोलिसांनी त्यास नकार दिला आहे.

ह्यावरून काही प्रश्न मला पडलेत ते असे.
१. क्रिकेटला एवढे महत्त्व का? सामने पुढे ढकलणे जमू शकले नसते का? २/३ वर्षांकरिता क्रिकेटच्या सामन्यांचे वेळापत्रक ठरविलेले असेल त्यामुळे ते कठीण आहे. पण हे सामने मुख्यत्वे भारताशीच निगडीत आहे. फक्त इतर देशांचे खेळाडूही त्यात आले आहेत, त्यामुळे निवडणुका असल्यास ते पुढे ढकलणे योग्य नाही का?
२. जर सामने आधीच ठरविले होते, तरी आपल्या निवडणुका एप्रिल-मे दरम्यान होऊ शकतात ह्याचा त्यांनी विचार केला नव्हता का? केला असल्यास सुरक्षिततेबाबतचा प्रश्न तेव्हाही विचारात असायला पाहिजे. तो आत्ताच का समोर आला? आणि मग आता सरकारला दोष का द्यावा?
३. एक कारण सांगतात की सामने रद्द केल्यास आर्थिक नुकसान होउ शकते. पण आता तर एका देशातून दुसर्‍या देशात सामने ठेवणार तेव्हा त्यात खर्चाचा प्रश्न नाही येत का?
४. सामन्याच्या वेळी ज्या राज्यात निवडणुका आहेत त्या खेळाडूंच्या मतदानाबाबत काय? उदा. निवडणूकीचे वेळापत्रक आणि सामन्यांचे वेळापत्रक पाहिल्यास कर्नाटक मध्ये २३ एप्रिल ला मतदान होणार आहे. त्याच दिवशी बँगलोर रॉयल चॅलेंजर्सचा सामना आहे. त्याबाबत काय? फक्त खेळाडू सोडा पण इतरही सदस्य त्यांच्या सोबत असतील त्यांच्या मतदानाचे काय? त्यांना बहुधा दुसर्‍या राज्यात त्या राज्याच्या मतदानाच्या दिवशी मतदानाची परवानगी देऊ शकतात का? दिली तरी हा अपवाद बरोबर आहे का? हाच अपवाद इतर खेळांकरीता मिळाला असता का?
५. आय पी एल च्या सामन्यांकरीता सुरक्षा मागणारे नेते, आताही जेथे सुरक्षिततेची नेमकी गरज आहे अशा संवेदनशील ठिकाणी पोलीस सुरक्षा वाढवून घेण्यात पुढाकार का घेत नाहीत? तसेच देशातील/राज्यातील इतर महत्वाच्या मुद्यांवर लक्ष देण्यापेक्षा क्रिकेटवर जास्त लक्ष का?

प्रश्न सध्या तरी संपले :)

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter