लोकप्रभामधील राजू परूळेकरांचे 'अल्केमिस्ट्री' वाचले. नुकत्याच चाललेल्या 'मराठी/महाराष्ट्रीय आणि सचिन' वादात त्यांनीही आपले हात धुवून घेतल्यासारखे वाटले, तेही 'सचिन' हे चलनी नाणे वापरून. वास्तविक मला त्यांचे मुद्देच पटले नाहीत. क्रिकेटविरोधात लिहायचे तर लिहा किंवा माध्यमांनी क्रिकेटला अवास्तव महत्व दिले म्हणून माध्यमांबद्दल लिहा की. उगाच सचिनला का त्यात ओढता? तुम्ही म्हणता तसे त्याने केले नसेल तरी त्याने बिघडवले काय?
असेच विचार मनात येत असताना, मराठीब्लॉग्स.नेट वर त्याच संबंधी लेख वाचले. त्यातील काही.
फक्त मला आणखी एक प्रश्न विचारावासा वाटतो.
परूळेकरांनी इतर दाखले देऊन सचिनने काय केले हा प्रश्न केलाय. पण त्यांनी स्वत:च्या अल्केमिस्ट्री ह्या लेखात फक्त राजकीय नेत्यांबद्दल (व एखाद दोन इतर लोक) लिहिलेय. दाखले दिलेल्या लोकांबद्दल त्यांनी स्वतः लिहिले असते तर आम्हालाही विचार करता आला असता.
पण त्यांनी माध्यमांच्या लोकांना ज्याप्रकारे दोष दिलेत त्याप्रमाणे स्वत:ही प्रसिद्ध नेत्यांवर लिहिण्यात पाने खर्च केलीत. जे इतर भरपूर ठिकाणी वाचायला मिळते त्यांच्याबद्दलच लिहून त्यांनी महाराष्ट्राकरीता काय केले? :)
असेच विचार मनात येत असताना, मराठीब्लॉग्स.नेट वर त्याच संबंधी लेख वाचले. त्यातील काही.
- राजू परूळेकर, सचिन तेंडुलकर आणि मराठी माणूस (sudhirnikharge)
- अल्केमिस्ट्री (प्रवीण)
- परूळेकरांना पत्र (sudhirnikharge)
- अल्केमिस्ट् उवाच.. बदनाम हुए तो क्या नाम तो हुआ !! (हेरंब ओक)
फक्त मला आणखी एक प्रश्न विचारावासा वाटतो.
परूळेकरांनी इतर दाखले देऊन सचिनने काय केले हा प्रश्न केलाय. पण त्यांनी स्वत:च्या अल्केमिस्ट्री ह्या लेखात फक्त राजकीय नेत्यांबद्दल (व एखाद दोन इतर लोक) लिहिलेय. दाखले दिलेल्या लोकांबद्दल त्यांनी स्वतः लिहिले असते तर आम्हालाही विचार करता आला असता.
पण त्यांनी माध्यमांच्या लोकांना ज्याप्रकारे दोष दिलेत त्याप्रमाणे स्वत:ही प्रसिद्ध नेत्यांवर लिहिण्यात पाने खर्च केलीत. जे इतर भरपूर ठिकाणी वाचायला मिळते त्यांच्याबद्दलच लिहून त्यांनी महाराष्ट्राकरीता काय केले? :)

